• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 1, 2024

न्हावा शेवा प्रकल्पास विलंब करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची एमआयएमची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : न्हावा शेवा (पारबंदर) प्रकल्पाच्या कामास विलंब केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच न्हावा शेवा प्रकल्पावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना माफक स्वरुपात टोलआकारणी  करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

न्हावा-शेवा (पारबंदर) प्रकल्पाचे लवकरच लोर्कापण होत आहे. या प्रकल्पाचे काम वेगवेगळ्या ठेकेदारांच्या माध्यमातून झालेले आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो लि.,  आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कंपनी लि. कंसोशिअम, मे. देवू इंजिनिअरींग अॅण्ड कंन्स्ट्रक्शन लि.,टाटा प्रोकेल्टस लि. जेव्ही,  स्ट्रॉबॅग इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड सेफ्टी सोल्यूशन्स जीएमबीएच जेव्ही अशा विविध कंपन्यांनी टप्याटप्याने काम केले आहे. या सर्वच ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीत काम न केल्याने कामास विलंब झालेला आहे. तसेच प्रकल्पाच्या खर्चात तब्बल २१९२ कोटी रुपये अतिरिक्त खर्च झालेला आहे. हा खर्च संबंधित ठेकेदारांनी वेळेत काम पूर्ण न केल्याने सरकारला भुर्दंड सोसावा लागलेला आहे.  त्यामुळे कामास विलंब आणि दोन हजार कोटींचा भुर्दंड यामुळे सरकारकडून या प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना राज्य सरकारने तातडीने काळ्या यादीत लवकरात लवकर टाकणे आवश्यक आहे, तशी कारवाई तातडीने करण्याचे निर्देश संबंधितांना देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांना निवेदनातून केली आहे.

या प्रकल्पामुळे मुंबई ते थेट न्हावा सेवा, पनवेल-उरण या दरम्यान नागरिकांना कमी वेळेत दळणवळणाची सुविधा उपलब्ध होईल. मात्र ही सुविधा सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली. त्यावर सरकारने भरमसाठ टोल आकारू नये. सर्वसामान्यांना परवडेल असाच टोल आकारावा आणि टोल कमी कालावधीकरता असेल यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. मुंबई-पुणे महामार्गासारखा अनेक वर्षे टोलचा भुर्दंड या महामार्गावरून सहन करावा लागू नये यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Previous Post

श्री रामललाची अयोध्यानगरीबरोबर नवी मुंबई शहर दीपोत्सवाने उजळणार : आ. मंदा म्हात्रे

Next Post

पालिका रुग्णालयातील रुग्णांवर फोर्टीजने मोफत उपचार करावेत : रविंद्र सावंत

Next Post
शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

पालिका रुग्णालयातील रुग्णांवर फोर्टीजने मोफत उपचार करावेत : रविंद्र सावंत

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

भुमीपुत्र भवनचे सिडकोने उद्घाटन न केल्यास एमआयएम पुढाकार घेणार : हाजी शाहनवाझ खान

प्रमोद मोरे यांचे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्याकडून अभिनंदन

प्रमोद मोरे यांचे कामगार नेते रविंद्र सावंत यांच्याकडून अभिनंदन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com