• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 1, 2019

४५ वर्षातील उच्चांकी बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्था चिंताजनक!: सचिन सावंत

adminbyadmin
in मुंबई
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनिल अंबानी यांची नार्को टेस्ट कराः सचिन सावंत

केंद्र सरकारने युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची मागणी

स्वयंम पीआर एजंन्सी

मुंबई : देशातील बेरोजगारीचे प्रमाण सध्या मागील ४५ वर्षात सर्वाधिक उच्चांकी ६.१ टक्के असल्याचे केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे मागील ५ वर्षातील सर्वात कमी आर्थिक विकास दर नोंदला गेल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. हे दोन्ही आकडे संपूर्ण देशाला चिंताग्रस्त करणारे असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

या आकडेवारीबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मागील ५ वर्ष देशाच्या आर्थिक विकास दरात घट होत आली आहे. शिवाय नवीन मोजणी करताना सुमारे ३६ टक्के कंपन्या अस्तित्वातच नव्हत्या, हे वास्तव देखील समोर आलेले आहे. त्यामुळे यावर्षी नोंदवला गेलेला अर्थव्यवस्थेच्या वाढीचा ६.८ टक्के दर प्रत्यक्षात ४ टक्क्यांच्याही खाली असण्याची शक्यता आहे. प्रचंड बेरोजगारी आणि ढासळती अर्थव्यवस्थेची दाहकता जनतेसमोर येऊ नये म्हणून सरकारकडून हे आकडे लपवण्याचे प्रयत्न झाले आहेत. हे अतिशय गंभीर मुद्दे असून, ते अनुत्तरीत राहणे देशाला परवडणारे नाही. सुमारे ६५ टक्क्यांहून अधिक युवकांची लोकसंख्या असलेल्या या देशात तरूणांच्या हाताला काम नसणे हे चित्र अत्यंत धोकादायक आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील दुसरे सरकार तरी या दोन्ही गंभीर प्रश्नांवर प्राधान्याने आणि युद्धपातळीवर काम करेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कृषी क्षेत्र आणि लघु व मध्यम उद्योगांकडे दुर्लक्ष झाल्याने देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. यंदाच्या आकडेवारीतूनही तेच प्रतित होत आहे. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी कृषी क्षेत्र आणि लघु व मध्यम उद्योगांच्या विकासाचे प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील व केवळ निवडक उद्योजकांवर असलेला गेल्या पाच वर्षातील सरकारचा प्राधान्यक्रम लघुउद्योजक आणि शेतकऱ्यांकडे वळवावा लागेल. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील गंभीर धोका लक्षात घेता नव्या केंद्र सरकारने आपल्या धोरणात व कारभारात बदल करावे, अशी मागणीही सावंत यांनी केली. 

 

Previous Post

वंचित आघाडीला महाआघाडीत यायचेच नव्हते : लोकनेते गणेश नाईक

Next Post

 परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांची आर्थिक ससेहोलपट थांबविण्याची  इंटकची मागणी

Next Post
 परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांची आर्थिक ससेहोलपट थांबविण्याची  इंटकची मागणी

 परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांची आर्थिक ससेहोलपट थांबविण्याची  इंटकची मागणी

कुकशेतमध्ये सोमवारी शनी महाराजांची महापुजा

कुकशेतमध्ये सोमवारी शनी महाराजांची महापुजा

कुकशेत गावात श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात

कुकशेत गावात श्री. शनी महाराजांची महापुजा उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com