• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 21, 2018

युवकांचा धीर सुटत चालला आहे, सरकारने आता तरी जागे व्हावे! : खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in मुंबई
0
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

बेरोजगारीची स्थिती विदारक, सरकारच्या आटोक्याबाहेर

मुंबई :- देशातील बेरोजगारीची परिस्थिती विदारक झालेली असून सरकारच्या आटोक्याबाहेर गेली आहे. युवकांचा धीर सुटला आहे. आज मुंबईत हजारो विद्यार्थ्यांना रेल्वे रूळावर उतरून आंदोलन करावे लागले, ही घटना याचे निदर्शक असून सरकारने वेळीच जागे व्हावे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, देशात दररोज जवळपास ३३ हजार युवक रोजगार मिळवण्याकरिता तयार होतात आणि केवळ ४५० नविन रोजगार तयार होतात. त्यातच सध्या नोकरीत असलेल्या नोकरदारांपैकी ५५१ लोकांच्या नोक-या रोज जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २ कोटी रोजगार देऊन असे आश्वासन देशाला दिले होते. परंतु रोजगार निर्मिती करण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. यातच सरकारतर्फे शासकीय कर्मचा-यांची व अधिका-यांची लाखो पदे रिक्त ठेवली जात आहेत हे अतिशय दुर्देवी आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून युवकांनी पकोडे तळावेत अशा त-हेची असंवेदनशील विधाने केली जात आहेत. हा देशातील युवकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. रेल्वेमध्ये जवळपास अडीच लाख पदे रिक्त असताना प्रशिक्षण घेतलेले हे विद्यार्थी ख-या अर्थाने कुशल कर्मचारी (Skilled Worker) आहेत. त्यांना नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे. स्किल इंडिया सारख्या सरकारच्या घोषणा किती तकलादू आहेत हे यावरून दिसून येत आहे.

ज्या पध्दतीने एवढ्या मोठ्या संख्येने युवक आंदोलनात उतरले त्यातून देशातील युवकांची मानसिकता दिसून येते. या आंदोलनात अनेक युवतीही होत्या त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला.  दमनशाहीने जनतेचा आक्रोश सरकारला दाबता येणार नाही. सरकारने या लाठीमाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. 

 

 

Previous Post

नवी मुंबईत दिघा-तुर्भे- बेलापूर आणि वाशी -घणसोली-महापे मेट्रो छन्न मार्गाचा(कॉरिडॉर) समावेश

Next Post

ऐरोली-कटई नाका बोगद्यावर नवी मुंबईत चढण्या-उतरण्यासाठी मार्गिका बांधा – आमदार संदीप नाईक

Next Post
वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी

ऐरोली-कटई नाका बोगद्यावर नवी मुंबईत चढण्या-उतरण्यासाठी मार्गिका बांधा - आमदार संदीप नाईक

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही, दहशतीपुढे पनवेलकर कधी झुकणार नाही!

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही, दहशतीपुढे पनवेलकर कधी झुकणार नाही!

गुजराथी नाही बिले मराठीत पाहिजे, मनसेचा एपीएमसी सचिवांना घेराव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com