• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 15, 2016

मुंबई महापालिका निवडणुकीतून आपची माघार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबई महापालिका निवडणुकीतून आपची माघार

 

* विधानसभा निवडणुकीतही या पक्षाने मैदानातून पळ काढला होता.

* मुंबईतील कार्यकर्त्यांचा  हिरमोड झाला

मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असतानाच  आम आदमी पक्षाने महापालिका निवडणूक लढवायची नाही असा निर्णयं घेतला आहे.  आम आदमी (आप) पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठांनी हा निर्णय  घेतला आहे. आप ने अचानक घेतलेल्या  निर्णयामुळे गेल्या  अनेक महिन्यापासून तयारी   करत असलेल्या  मुबईतील कार्यकर्त्यांचा  हिरमोड झाला आहे.
आम आदमी पक्षाने मुंबई महापालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागा लढवण्याची तयारी केली होती. 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीचे  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या  उपस्थितीत पक्षाच्या निवडणुकीचा नारळही फुटणार होता. मात्र आप ने यू टर्न घेतला आहे.  फेब्रुवारी मध्ये  पंजाब आणि  गोवा  विधानसभेच्या निवडणुका  होत आहेत. आप ने या दोन्ही राज्यात मोठ्या ताकदीने उतरायचे ठरवले आहे. त्यामुळे पक्षाचे स्टार नेते आणि  बिनीचे कार्यकर्ते या दोन राज्यात व्यस्त असणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीस फारसा वेळ देता येणार नाही त्यामुळेच हा निर्णय  घेतल्याचे सांगीतले जात आहे. मात्र आम आदमी पक्षातून फुटून नवा स्वराज्य पक्ष स्थापन झाल्याने आपचे मुंबईतील समाजवादी कार्यकर्त्यांची पांगापांग झाली आहे परिणामी मुंबईतील प्रीती मेनन, सतीश जैन, मयांक गांधी आदी दहाबारा नेत्याव्यतिरीक्त आपकडे कोणी बडे नेते नाहीत. मुंबईत पक्षाला काही जनाधारही नाही. तसेच पक्षाने मागच्या वर्षभरात मुंबईकरांसाठी काही विशेष कार्यक्रमही राबवलेले नाहीत, त्यामुळेच पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी मुंबई महापालिका निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. मागच्या लोकसभेच्या निवडणुका या पक्षाने राज्यात लढवल्या होत्या. त्यात पक्षाला विशेष यश मिळवता आले नाही . विधानसभा निवडणुकीतही या पक्षाने मैदानातून पळ काढला होता. आता पालिका निवडणुकीचे ही मैदान सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

Previous Post

बालदिनानिमित्त बाळ मेळावा उत्साहात

Next Post

बेस्टमधील मेगा भरतीबाबत सदस्यांना अंधारात ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

Next Post
बेस्टमधील मेगा भरतीबाबत सदस्यांना अंधारात ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

बेस्टमधील मेगा भरतीबाबत सदस्यांना अंधारात ठेवणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी

नोटबंदी मोठा घोटाळा म्हणून समोर येईल – राहुल गांधी

नोटबंदी मोठा घोटाळा म्हणून समोर येईल - राहुल गांधी

‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ पर्यटनस्थळी विद्यतु पोलची मोडतोड

‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ पर्यटनस्थळी विद्यतु पोलची मोडतोड

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com