• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 17, 2016

वातानुकुलित बसचे भाडे ‘जैसे थे’च!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
वातानुकुलित बसचे भाडे ‘जैसे थे’च!

शिवसेना-भाजपाच्या वादात बेस्टचे नुकसान

मुंबई : बेस्टच्या भाड्यामध्ये कपात करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीमध्ये मंजुरी मिळण्याच्या घटनेला १५ दिवसच उलटले असतानाही त्याचा तिकिट दर कपातीचा  अजूनही फायदा मिळालेला नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बेस्टच्या तिकिट दर कपातीच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळण्यामागचे खरे कारण शिवसेना भाजपातील वाद असल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे.

बेस्ट समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर भाजपाकडून ‘अच्छे दिन’चे पालुपद आळविण्यातआले होते. वीज दर कमी करण्याकरता बेस्ट प्रशासनाकडून एक प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला पाठविण्यात आला. बेस्ट बसच्या दरामध्ये फेरबदल करण्याचाही निर्णय घेण्यात आला. वातानुकूलित बसेसचे दर अर्ध्यावर करण्याच्या

प्रस्तावालाही बेस्ट समितीमध्ये मंजुरी देण्यात आली असली तरी प्रवाशांच्या खिशाला मात्र आजही जुन्याच दराची झळ सहन करावी लागत आहे.

बेस्टच्या वातानुकूलित बससेवा तोट्यात चालविली जात आहे. या बससुविधेकडे प्रवाशांना आकर्षित करण्याकरता दर ५० टक्के कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रस्ताव तयार करून ४ मे रोजी बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला. या प्रस्तावाला ४ मे रोजीच मंजुरी मिळाली असली तरी तिकिटाचे दर मात्र आजही कमी झालेले नाहीत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बेस्टच्या वातानुकूलित बससुविधेचा प्रवाशांना लाभ घेता यावा याकरता ४ मे रोजी बेस्टच्या सभेचे आयोजन केले असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावकर यांनी सांगितले. हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडेही पाठविण्यात आला आहे. काही कारणास्तव हा प्रस्ताव महासभेत घेण्यात आला नाही. बेस्टच्या या प्रस्तावाला मंजुरी मिळावी याकरता महापौरांशी चर्चा करून विशेष सभेचे आयोजन करण्याकरता त्यांना मिठबावकर यांनी पत्रही दिले आहे. परंतु सभा बोलविण्याचा व विषय घेण्याचा अधिकार महापौरांकडे असल्याने याचा निर्णय आता महापौरांवर अवलंबून आहे.

शिवसेना-भाजपाच्या वादात बस प्रबाशी भरडले जात असून बेस्ट उपक्रमाचेही नुकसान होत असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या रवी राजा यांनी केला आहे. महापौर मुंबईच्या बाहेर

असल्यावर उपमहापौर मनपाची महासभा आयोजित करू शकतात. परंतु उपमहापौर भाजपाच्या आहेत. सेना-भाजपाच्या अंर्तगत वादामुळे हा प्रस्ताव रखडला आहे.

उन्हाळ्याचे दिवस असतानाही प्रवाशी वातानुकूलित बससेवेकडे पाठ फिरवत असल्याची नाराजी रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. महापालिकेची महासभा २७ मे रोजी होत असून महासभेत मंजुरी मिळाल्यावर वातानुकूलित बसचे किमान तिकिट दर ३० रूपायांवरून १५ रूपये होईल, २० रूपयामध्ये प्रवाशी ४ किलोमीटरपर्यत प्रवास करतील. नवीन तिकिट दर लागू झाल्यावर अवघ्या ९० रूपयांमध्ये ६० किमीचा आल्हाददायक प्रवास करू शकतील. लहान मुलांनाही तिकिट दरामध्येही सवलत मिळणार आहे.

Previous Post

मुंबई उपनगरी रेल्वेच्या १३१ कर्मचाऱ्यांचा रेल्वे रूळाने घेतला बळी

Next Post

अल्पवयीन मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत वाढ

Next Post
अल्पवयीन मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत वाढ

अल्पवयीन मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत वाढ

ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

मनोरमा देवी शरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मनोरमा देवी शरण, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com