• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 17, 2016

मुंबई उपनगरी रेल्वेच्या १३१ कर्मचाऱ्यांचा रेल्वे रूळाने घेतला बळी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबई उपनगरी रेल्वेच्या १३१ कर्मचाऱ्यांचा रेल्वे रूळाने घेतला बळी

दरवर्षी सरासरी २२ बळी

मुंबई उपनगरी रेल्वेच्या रूळावर होणाऱ्या अपघातात रेल्वे प्रवाशांचा मृत्यु होतो. अशाचा भाग नसून रेल्वेच्या विविध कामात असलेल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा बळी जातो. दरवर्षी सरासरी १२ बळी घेणाऱ्या रेल्वेच्या रूळावर झालेल्या अपघातात गेल्या ६ वर्षात तब्बल १३१ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस लोहमार्ग पोलीसांनी दिली आहे. सर्वाधिक १९ बळी दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले असून त्यानंतर १७ बळी घेणाऱ्या कुर्ल्याचा नंबर लागतो.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वर्ष २०१० ते २०१५ या कालावधीत रेल्वे रूळावर अपघात झालेले रेल्वे कामगार, कंत्राटी कामगार आणि गैंगमेन यांची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मागितली होती. लोहमार्ग पोलीसांनी अनिल गलगली यांस कळविले की मुंबई पोलीस लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या ६ वर्षात एकूण १३१ कर्मचाऱ्यांचा मृत्यु रेल्वे रूळावर झालेल्या अपघातात झाला आहे. रेल्वेच्या १६ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक मृत्यु दादर रेल्वेच्या हद्दीत झाले असून त्याची संख्या १९ आहे. त्यानंतर १७ कुर्ला, कल्याण १४, डोंबिवली १३, सीएसटी ११, ठाणे १०, कर्जत ५ प्रत्येकी ७-७ मृत्यु पालघर,बोरीवली, प्रत्येकी ६-६ मृत्यु वसई रोड, अंधेरी , प्रत्येकी ४-४ वाशी, बांद्रा आणि मुंबई सेंट्रल, पनवेल ३, वडाळा १ अशी क्रमवारी आहे.

नुकसान भरपाईची माहिती उपलब्ध नाही

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वर्ष २०१० ते २०१५ या कालावधीत रेल्वे रूळावर अपघात झालेले रेल्वे कामगार, कंत्राटी कामगार आणि गैंगमेन यांची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मागितली होती. लोहमार्ग पोलीसांनी अनिल गलगली यांस कळविले की नुकसानभरपाई रेल्वे प्रशासनाकडून दिली जाते त्यामुळे सदरची माहिती इकडील कार्यालयाकडे आणि संबंधित पोलीस ठाण्याकडे उपलब्ध नाही. रेल्वे रूळावर अपघात होताच नेहमीच रेल्वे प्रवाशांना दोष देणारे रेल्वे प्रशासन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अपघाताकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. अशा अपघातावर नियंत्रण ठेवण्यास रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे,अशी टीका अनिल गलगली यांनी केली आहे.

Previous Post

देश नेमकं कोर्ट चालवतय की सरकार ? – राज ठाकरे

Next Post

वातानुकुलित बसचे भाडे ‘जैसे थे’च!

Next Post
वातानुकुलित बसचे भाडे ‘जैसे थे’च!

वातानुकुलित बसचे भाडे ‘जैसे थे’च!

अल्पवयीन मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत वाढ

अल्पवयीन मुलींच्या गर्भपातांच्या संख्येत वाढ

ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

ठाणे विधानपरिषद निवडणूक, वसंत डावखरे विरुद्ध रविंद्र फाटक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com