• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 12, 2016

आता साखरही महागणार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आता साखरही महागणार

नवी मुंबई : अच्छे दिनची वाट पाहत असलेल्या जनतेला डाळी पाठोपाठ आता साखरेच्या दरवाढीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पन्न कमी होणार असून मगणीच्या तुलनेत पुरवठा कमी होण्याची चिन्ह आहेत. साखरेचे कमी होत असलेले उत्पन्न, दुष्काळामुळे कमी होत असलेले उसाचे उत्पन्न, कारखानदार अणि शेतकार्‍यांमध्ये सुरू असलेला एफआरपीचा वाद याचा फटका साखर उद्योगाला बसला आहे.
गेल्या पाच महिन्यात साखरेच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात प्रति क्विंटल १८०० रूपये असलेला साखरेचा दर २९०० रूपये प्रति क्विंटलवर पोहचला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात साखरेची मागणी वाढेल पण कमी उत्पादन होत असल्याने दरात वाढ होवून सर्वसामान्यांना साखर महाग होईल अशी भीती साखर संघाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांने व्यक्त केली आहे.
गेल्या गाळप हंगामात २०१४ -१५ या वर्षात ९३० लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले होते. तेच उत्पादन २०१५-१६ सालात घटून ७६० लाख मेट्रीक टनावर येण्याची दाट शक्यता आहे. तर त्या पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०१६-१७ साली साखरेच्या उत्पन्नात ६०० लाख मेट्रीकटना पर्यंत घट होवू शकते. या साखरेच्या उत्पादनातील हा चढ-उतार पाहता साखरेचा तुटवडा निर्माण होणार आहे हे निश्चित असल्याचे ही साखर संघाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
साखरेचे दर प्रति क्विंटर तब्बल ११०० रूपयांनी वाढले आहेत. या वाढलेल्या दराचा लाभ थेट व्यापार्‍यांच्या खिशात जाणार आहे. व्यापारात एक सूत्र असे आहे की, जेव्हा व्यापार्‍यांना लाभ होतो तेव्हा सामान्यांना त्याचा फटका बसतो. अशीच काहीशी स्तिथि पुढच्या काळात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करखान्यांना आपला लाभ कर्ज फेडीवर खर्च होणार असल्याने कारखान्यांच्या ताळेबंदीवरही त्याचा परिणाम आत्तापासूनच दिसून येत आहे.
कारखान्यांना या आर्थिक वर्षात ११०० कोटी रूपयांचे कर्ज फेडायचे आहे. राज्यात सध्या १७० साखर कारखाने सुरू आहेत. त्या पैकी तब्बल ६० टक्के कारखाने हे तोट्यात आहेत. दुष्काळामुळे २० ते २५ टक्के उत्पादन कमी झाले आहे. राज्यातील करखान्यात दीड लाख कामगार काम करत आहेत. या परिस्थितीवर सरकारने लक्ष घावून वेळीच उपाययोजना करण्याची वेळ आली असून यावर उपाय योजना करण्यात उशीर झाल्यास ग्रामीण भागातली आर्थिक स्थिति कोलमडून जाईल अशी भीती ही वर्तवण्यात येत आहे.

Previous Post

मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची?

Next Post

दिघा प्रभाग समितीचे स्वच्छतेत एक पाऊल पुढे!

Next Post
दिघा प्रभाग समितीचे स्वच्छतेत एक पाऊल पुढे!

दिघा प्रभाग समितीचे स्वच्छतेत एक पाऊल पुढे!

भाजपकडून सेना खासदारांना पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक

भाजपकडून सेना खासदारांना पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक

संजय पाथरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

संजय पाथरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com