• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 12, 2016

मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची?

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची?

* राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा महापालिका सत्ताधार्‍यांना सवाल
मुंबई : मुंबईतील खड्डेमय रस्ते, उघडी गटारे, वीज विभागाचे उघडे डिपी आणि तुटलेले पदपथ हे मुंबईकरांसाठी आता मृत्युचे सापळे बनले असून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणावर आहे, याचा खुलासा करण्याचे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी महापालिकेतील सत्ताधार्‍यांना दिले आहे. तसेच मुंबईकरांसाठी विमा सुरक्षेचे आश्वासन देणार्‍या सत्ताधार्‍यांनी आता खरोखरच त्या दृष्टीने विचार करण्यास हरकत नाही, असा टोलाही त्यांनी सत्ताधार्‍यांना लगावला आहे. वांद्रे येथे मॅनहोलमध्ये पाय अडकून विजय हिंगोरानी या रहिवाशाला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाय मॅनहोलमध्ये अडकून झालेल्या अपघातानंतर वांद्रे येथील विजय हिंगोरानी या नागरिकाने मुंबई महापालिकेवर दीड कोटींच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. या घटनेमुळे महापालिकेच्या गचाळ कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईकरांना आला असल्याची टीका अहिर यांनी केली. एकिकडे स्मार्ट सिटीच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे मुंबईसारख्या प्रगत शहरातील नागरिकांना साध्या सुविधांपासून वंचित ठेवायचे, असा महापालिकेतील सत्ताधार्‍यांचा कारभार असून सत्ताधारी मात्र एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत. मग नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची या बाबीचा खुलासा सत्ताधार्‍यांनी करावा, असे थेट आव्हान अहिर यांनी दिले आहे.
मुंबईकर केंद्र आणि राज्य सरकारकडे ज्या प्रमाणात कर भरतात, त्या प्रमाणात त्यांना सुविधा मिळणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही, उलट आहे त्या सुविधांचा दर्जाही अतिशय सुमार असल्याकडे अहिर यांनी लक्ष वेधले. तसेच हिंगोरानी यांना झालेल्या अपघातानंतरही बरेच दिवस त्या मॅनहोलला झाकण लावण्याची तसदीही महापालिकेने घेतली नसल्याबद्दल अहिर यांनी संताप व्यक्त केला.

Previous Post

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

आता साखरही महागणार

Next Post
आता साखरही महागणार

आता साखरही महागणार

दिघा प्रभाग समितीचे स्वच्छतेत एक पाऊल पुढे!

दिघा प्रभाग समितीचे स्वच्छतेत एक पाऊल पुढे!

भाजपकडून सेना खासदारांना पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक

भाजपकडून सेना खासदारांना पुन्हा एकदा अपमानास्पद वागणूक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com