• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 8, 2015

विरोधकांचा मोर्चा पोहोचला विधानभवनाच्या पायर्‍यांवर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
विरोधकांचा मोर्चा पोहोचला विधानभवनाच्या पायर्‍यांवर

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कॉंग्रेस राष्ट्रवादीने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावर उतरली आहे. विधानभवनाच्या पायर्‍यांवर विरोधकांनी निदर्शने करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोमवारपासून सुरु झाले आहे. पहिल्या दिवशी संयमाची भूमिका घेणारे विरोधक दुसर्‍या दिवसापासूनच सरकारवर हल्लाबोल सुरु केला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर केवळ कर्जमाफी हाच पर्याय उरल्याचे सांगत विरोधकांनी विधीमंडळाबाहेर निदर्शने केली. आज सकाळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर बसून निदर्शने केली. त्यानंतर विधानसभेत जाऊ अध्यक्षांच्या समोर जाऊन घोषणाबाजी केली.
शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकर्‍यांना पॅकेज दिलेच पाहिजे अशा घोषणा घेत सरकारचा निषेध नोंदवला. आपल्याला माहित असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव पर्याय नसल्याचे म्हटले होते. विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरत कर्जमाफी हाच पर्याय असल्याचे ठासून सांगितले आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, अजित पवार, छगन भुजबळ आदी नेते आंदोलनात सहभागी झाले होते.
सोमवारी पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून शिवसेना-भाजप आमने सामने आले. त्यानंतर राष्ट्रवादीने संत्राफेक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. मंगळवारी कर्जमाफी, नापिकीसारख्या मुद्द्यावर विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे फलक घेऊन सकाळीच विधान भवनाच्या पायर्‍या गाठल्या. बिजेपी सरकार मे गडबड झाला है, सरकार की दाल मे कुछ काला है.’ असा मजकूर असलेले फलक घेऊन विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. सरकारने शेतकर्‍यांला वार्‍यावर सोडले आहे. राज्यात नापिकी असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

Previous Post

दररोज अडीच लाख रेल्वे प्रवासी प्रवास करतात डोंबिवली स्टेशनवरून!

Next Post

प्रताप म्हसणे अनंतात विलीन

Next Post

प्रताप म्हसणे अनंतात विलीन

डपिंग ग्राऊंड धुराच्या विळख्यात गुदमरतोय दिवावासियांचा श्‍वास

डपिंग ग्राऊंड धुराच्या विळख्यात गुदमरतोय दिवावासियांचा श्‍वास

बाबासाहेबांना हात लावाल तर खबरदार – राज ठाकरे

स्मार्ट सिटी योजना अत्यंत फसवी- राज ठाकरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com