• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 1, 2015

महापालिका शाळांमधील मुलांना अगोदर प्राथमिक सुविधा पुरवा, मगच ‘हायटेक’ बनवण्याची स्वप्ने पहा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
महापालिका शाळांमधील मुलांना अगोदर प्राथमिक सुविधा पुरवा, मगच ‘हायटेक’ बनवण्याची स्वप्ने पहा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा शिवसेनेला टोला
मुंबई : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी, त्यांना टॅब देण्याची भाषा करणार्‍या आणि पंतप्रधान मोदींच्या महत्त्वकांक्षी डिजीटल इंडिया’ची स्वप्ने पाहणार्‍यांनी अगोदर महापालिका शाळांमधील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक सुविधा पुरवाव्यात, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला दिला आहे. मुंबईतील शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा दावा करत त्याचे प्रात्याक्षिक दाखवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते.
मुंबईत आजमितीला तब्बल १२०० महापालिकेच्या शाळा असून त्यात जवळपास साडेचार लाख मुले शिक्षण घेतात. या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा अतिशय खालावलेला असल्याची बाब अनेक संस्थांच्या सर्वेक्षणाद्वारे उघड झाली आहे. या शाळांमधून शिकणार्‍या पाचवीतल्या २२ टक्के मुलांना साधी अक्षरओळख नसल्याची धक्कादायक बाब मध्यंतरी एका संस्थेने केलेल्या पाहणीद्वारे समोर आली होती. या शाळांमधील मुलांचे शिक्षण गळतीचे प्रमाणही मोठे आहे. तसेच या शाळांमधील सोयीसुविधांचेही तीन तेरा वाजलेत. शिवाय शाळेचा अस्वच्छ परिसर, मुलांच्या प्रमाणात अपुर्‍या आणि अस्वच्छ मुतार्‍या या सगळ्या बाबींमुळे मुले आजारी पडण्याचे प्रमाणही मोठे आहे. शाळेच्या काही इमारतीही धोकादायक अवस्थेत आहेत. एवढेच नव्हे तर मुलांना मोफत मिळणारे गणवेश आणि वह्या पुस्तकेही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार ऐकू येत असतात. अशा वेळी या प्राथमिक बाबींकडे लक्ष देऊन शाळांचा दर्जा सुधारण्याऐवजी शिवसेनेच्या अतिउत्साही नेत्यांनी टॅबची स्वप्ने दाखवणे म्हणजे गरीब आणि गरजु मुलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका श्री. अहिर यांनी यावेळी केली. या योजनेमागे खरोखरच विद्यार्थ्यांचे भले करण्याचा हेतु आहे की, काही आर्थिक समिकरणांमुळे ही योजना रेटली जात आहे का ? याचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे अगोदर शाळांचा दर्जा सुधारा, मुलांना खाजगी शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांच्या स्पर्धेत उभे राहाण्याइतके सक्षम बनवा आणि मगच मुलांना हायटेक बनवण्याची स्वप्ने पहा, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

Previous Post

शेतकर्‍याला जबर मारहाण, पोलिसांचे निलंबन

Next Post

आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गावामध्ये आधार कार्डसह पॅन कार्ड शिबिर

Next Post
‘प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील सरसकट कारवाई तपासून पाहू’

आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ गावामध्ये आधार कार्डसह पॅन कार्ड शिबिर

मध्यरात्री मुंबई लोकलमधून फिरली बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’!

मध्यरात्री मुंबई लोकलमधून फिरली बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’!

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकांना दांडी मारण्यात पंकजा मुंडे अव्वल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com