• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 13, 2024

पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’

adminbyadmin
in देश - विदेश
0
पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलले आहे. पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी एक मोठी घोषणा केली.

अमित शहा यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की ‘देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबारचे योगदान दर्शवत राहील’.

गृहमंत्री शहा म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चोल सम्राटांनी या बेटांवरच त्यांच्या नौदलाचे तळ उभारले होते. हे बेट भारताच्या सुरक्षेला व विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटावर भारताचा तिरंगा फडकवला होता. वीर सावरकर व इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेला गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीचा मोठा लढा इथेही उभारला होता. हे बेट त्या स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देत आहे.

इंग्रजांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांना, वास्तूंना दिलेली नाव मोदी सरकार बदलत आहे. केंद्राने आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलली आहेत. त्यात आता पोर्ट ब्लेअरचे नाव समाविष्ट झाले आहे. पोर्ट ब्लेअर हे बंदर आता श्री विजयपुरम या नावाने ओळखले जाईल. १७८९ साली ईस्ट इंडिया कंपनीने आर्चीबाल्ड ब्लेअर यांच्या सन्मानार्थ या बेटाचे नाव पोर्ट ब्लेअर असे ठेवले होते, जे आता मोदी सरकारने बदलले आहे.

पोर्ट ब्लेअर हे भारतातले एक सुंदर बेट आहे. विशाखापट्टनम, कोलकाता व चेन्नईवरून जहाजाने पोर्ट ब्लेअरला जाता येते. पोर्ट ब्लेअरला पोहोचण्यासाठी विशाखापट्टनमहून ५६ तास, चेन्नईवरून ६० तास व कोलकात्याहून ६६ तास प्रवास करावा लागतो. यासह दिल्ली, कोलकाता, मुंबई व हैदराबादवरून विमानाने पोर्ट ब्लेअरला जाता येते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (१३ सप्टेंबर) एक मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलले आहे. पोर्ट ब्लेअर बंदर हे आता ‘श्री विजयपुरम’ या नावाने ओळखले जाणार आहे. अमित शहा यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. या संकल्पापासून प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम’ असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यामधील अंदमान निकोबरचं योगदान दर्शवत राहील”.

गृहमंत्री शाह म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चोल सम्राटांनी या बेटांवरच त्यांच्या नौदलाचे तळ उभारले होते. हे बेट भारताच्या सुरक्षेला व विकासाला गती देण्यासाठी सज्ज झालं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटावर भारताचा तिरंगा फडकवला होता. वीर सावरकर व इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेला गुलामीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीचा मोठा लढा इथेही उभारला होता. हे बेट त्या स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देत आहे.

इंग्रजांनी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांना, वास्तूंना दिलेली नावं मोदी सरकार बदलत आहे. केंद्राने आतापर्यंत अनेक शहरांची नावं बदलली आहेत. त्यात आता पोर्ट ब्लेअरचं नाव समाविष्ट झालं आहे. पोर्ट ब्लेअर हे बंदर आता श्री विजयपुरम या नावाने ओळखले जाईल. १७८९ साली ईस्ट इंडिया कंपनीने आर्चीबाल्ड ब्लेअर यांच्या सन्मानार्थ या बेटाचे नाव पोर्ट ब्लेअर असे ठेवले होते, जे आता मोदी सरकारने बदलले आहे.

पोर्ट ब्लेअर हे भारतातले एक सुंदर बेट आहे. विशाखापट्टनम, कोलकाता व चेन्नईवरून जहाजाने पोर्ट ब्लेअरला जाता येतं. पोर्ट ब्लेअरला पोहोचण्यासाठी विशाखापट्टनमहून ५६ तास, चेन्नईवरून ६० तास व कोलकात्याहून ६६ तास प्रवास करावा लागतो. यासह दिल्ली, कोलकाता, मुंबई व हैदराबादवरून विमानाने पोर्ट ब्लेअरला जाता येते.

Previous Post

पद्मभूषण गायक शंकर महादेवन, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केली गणरायाची पूजा

Next Post

१४०२२ श्रीगणेशमूर्तींसह २५६९ गौरींचे भावपूर्ण विसर्जन

Next Post
१४०२२ श्रीगणेशमूर्तींसह २५६९ गौरींचे भावपूर्ण विसर्जन

१४०२२ श्रीगणेशमूर्तींसह २५६९ गौरींचे भावपूर्ण विसर्जन

नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात तोडक कारवाई

नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात तोडक कारवाई

सुवर्णमहोत्सवी वर्षाची  ‘एक गाव एक गणपती’ परंपरा जपणारे आदर्शवत रिटघर गाव

सुवर्णमहोत्सवी वर्षाची  ‘एक गाव एक गणपती’ परंपरा जपणारे आदर्शवत रिटघर गाव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com