• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 18, 2024

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: संदीप खांडगेपाटील

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
विना भूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: संदीप खांडगेपाटील

नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जुन्नर रोडवरील पिंपळगावमधील रोडवरील गट क्रमांक ३०८/१ येथील आमच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे जागेवरील विनाभूसंपादन अतिक्रमण तातडीने हटवून अतिक्रमणास खुलेआमपणे मदत करणाऱ्यांवर तसेच न्यायालयीन प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर खोटी माहिती देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अतिक्रमणाच्या धसक्यामुळे मयत झालेल्या शेतकऱ्यांचे पुत्र संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे पोलीस महासंचालक व पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक या सर्वांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
या निवेदनात पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी १) विनाभूसंपादन शेतीवर शासकीय अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या परिवाराला न्याय मिळणार काय?, २) कोणत्याही प्रकारचे भूसंपादन न करता शेतावर अतिक्रमण करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?, ३) ३) न्यायालयात केस सुरू असतानाही शेतकरी परिवार केस हरल्याचे सोशल मिडियावर (यू ट्यूब) अफवा पसरवणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचावर फौजदारी गुन्हा लवकरात लवकर दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करणेबाबत, ४) ४) विना भूसंपादन शेतावर अतिक्रमण करण्यासाठी पोलीस संरक्षण उपलब्ध न करून देण्याची मागणी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव (आर्वी) येथील माझे वडील कै. उत्तम विष्णू खांडगे (७६ वर्षे वय) आणि माझे चुलते चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७०) या दोन शेतकऱ्यांच्या नारायणगाव-जुन्नर रोडवरील गट क्रमांक ३०८/१ शेतात अतिक्रमण झाले असून कोणत्याही प्रकारचा मोबदला या शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. २०१३-१४ सालीही धाकधपटशा व दंडेलशाहीच्या बळावर प्रशासनाने या दोन भावाच्या शेतात अतिक्रमण करून पायवाटेचे मोठ्या रस्त्यात रूपांतर करून डांबरीकरण केले होते. या रस्त्याची कोठेही प्रशासन दरबारी नोंद नाही. गावात तीन शासकीय रस्ते याअगोदरच नारायणगाव –जुन्नरला उपलब्ध असून या दोन शेतकऱ्यांच्या जमिनित काही घटकांनी दडपशाही करून या आमच्या तब्बल ४२ गुंठे जमिनीचे नुकसान करण्यात आलेले आहे. भूसंपादन केले नसल्याची कबुली प्रशासन देत आहे. माझे वडील व चुलते हे दोघे शेतकरी बंधू आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्यायालयीन पातळीवर संघर्ष करत आहेत. भूसंपादन नाही, शेतकऱ्यांना मोबदला नाही. कागदावर या रस्त्याची नोंद नाही. सर्व बेकायदेशीर असतानाही या दोन शेतकऱ्यांच्या जमिनीवर पुन्हा एकवार जिल्हा परिषद डागडूजी करत असल्याचा प्रकार पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निदर्शनास आणून दिला आहे.
नारायणगाव-जुन्नर रोडवरील १) कै. उत्तम विष्णू खांडगे २) चंद्रकांत विष्णू खांडगे यांच्या पाच एकर जमिनीवर ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद अधिकारी व ठेकेदार यांनी भूसंपादन न करता पोलीसी ताकदीवर डांबरी रस्ता बनविला आहे. विना भुसंपादन पोलिसी पाठबळावर गावच्या पुढाऱ्यांनी दमदाटी करत आमच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे शेतावर अतिक्रमण केले आहे. या दोघा शेतकऱ्यांचे वडील कै. विष्णू भागोजी खांडगे यांनी १९६५ ला जमिन विकत घेतली, त्यावेळी कागदावर रस्ता नव्हता व आजही कागदावर रस्त्याची नोंद नाही. या शेताचे सरकारने आजतागायत कोणत्याही प्रकारचे भूसंपादन केलेले नाही. शेतकऱ्यांना एक पैशाचाही मोबदला न देता गावचे पुढारी दहशतीच्या बळावर या दोन शेतकऱ्यांच्या जमिनीवर वर्षानुवर्षे अतिक्रमण करत आहेत. गावपुढाऱ्यांच्या दहशतीमुळे या दोन शेतकरी परिवाराचे मानसिक संतुलन ढासळले आहे. यातील एक शेतकरी माझे वडील कै. उत्तम विष्णू खांडगे यांचे गावपुढाऱ्यांच्या दहशतीमुळे आणि शेतात विनाभूसंपादन पोलीसी पाठबळावर व सोशल मिडियावर सरपंच व ग्रामसेवल खोटी माहिती देवून गावाची दिशाभूल करत असल्याने दहशतीचा धसका घेवून ८ ऑक्टोबर २०२३ रोजी निधन झाले आहे. स्वत:च्या शेतात पोलिसी पाठबळावर सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची या दोघा शेतकऱ्यांच्या शेताचे तीन तेरा वाजवले आहे. शिवाय गावपुढारी सतत रस्त्यावरून ये-जा करत असल्याने आमच्या परिवाराच्या जीवीताला धोका निर्माण झाला असल्याची भीती पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
अनधिकृतरित्या झूडशाहीच्या बळावर व काही ग्रामस्थांच्या राजकीय ओळखी व मंत्रालयीन ओळखीवर बनविला जात असून आता खोटी कागदपत्रेही बनविली जाण्याची भीति आहे. आता गावपुढारी १९६५ पूर्वी या रस्त्याला पूर्वीच्या मालकाने परवानगी दिल्याचे खोटे सांगत आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. आजही सुनावणी होत आहे. तथापि पोलिसी बळावर रस्ता काम सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य व सरपंच केस आम्ही जिंकलो आहोत, खांडगे कंपनी केस हरली आहे, असे सांगत न्यायप्रविष्ठ प्रकरणात प्रसिद्धी माध्यमांची व ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचे धाडस दाखवित आहेत. राज्य सरकारने न्यायालयात केस सुरू असतानाही केसबाबत सोशल मीडियावर (यूट्यूब) खोटी माहिती देवून अफवा पसरविणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. वास्तविकपणे या शेतकऱ्यांच्या शेतातून तब्बल ४२ गुंठ्याची नासाडी करत विनाभूसंपादन करत रस्ता बनविला होता. गावपुढारी रस्ता बनवित असताना पोलीस घेवून हजर असतात. पोलीस त्यांना संरक्षण देत शेतकऱ्यांच्या परिवाराला दमदाटी करत असतात. कोर्टात जा, तिथे काय करायचे ते करा, अशी दमदाटी करत असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
दि. ३० मे २०२३ रोजी पोलीस पाठबळावर गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केस जिंकल्याचे खोटे सांगत व जिल्हा परिषद अधिकारी भूसंपादन झाले नसल्याचे बेधडक सांगत शेतकरी परिवाराचे खच्चीकरण करत होते. रस्त्याचे काम सुरू असताना वयोवृद्ध शेतकरी उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) जीव तोडून या शेताचे भूसंपादन नाही, एक रूपयाचा मोबदला नाही. आमच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे जागेवर पोलिसी बळावर अतिक्रमण झाले आहे. असे सांगत होते. (यापूर्वीही २०१३-१४ दरम्यान झुंडशाहीच्या बळावर वयोवृद्ध शेतकऱ्यांना न जुमानता रस्त्याचे डांबरीकरण केले होते.) या रस्ता कामामुळे उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) शेतात पाणी साचून पिके वाया जाण्याची व जमिनी भिजाट होण्याची शक्यता आहे. या शेतातील अतिक्रमणामुळे गावपुढाऱ्यांच्या दहशतीचा धसका घेतल्याने उत्तम विष्णू खांडगे यांचे निधन झाले असून त्यांचा परिवार पोरका झाला आहे. दुसरे शेतकरी चद्रकांत विष्णू खांडगे यांनीही शेतात होत असलेल्या अतिक्रमणाचा व गावपुढाऱ्यांच्या दहशतीचा धसका घेतल्याने नवी मुंबईतील वाशी येथील फोर्टीज रूग्णालयात गेल्या २५ दिवसांपासून आयसीयूत आहेत. शासकीय अतिक्रमणामुळे या दोन परिवाराची वाताहत झाली आहे. शेतात अतिक्रमण कायम आहे. गावपुढारी या घरांचा होत असलेला तमाशा पाहत आहे. गेली सात महिने या शेतकऱ्यांच्या घरापुढे ग्रामपंचायतीची वीज नाही. बल्ब बदलले जात नाही. या एका परिवारातील विधवा महिला आमची आई श्रीमती रत्नप्रभा उत्तम खांडगे यांना रात्री अंधारात ठेवणऱ्यात गावपुढारी किती असूरी आनंद घेत असतील, याची कल्पनाही करवत नाही. ग्रामपंचायत सदस्यांना या परिवारातील अनेकांनी वीज नसल्याची तक्रार केली असतानाही सहा महिने नवीन बल्ब बसविले जात नाही.
आम्ही न्यायालयात लढतोय, पण आता अतिक्रमणामुळे शेतातील ४२ गुंठे जागा गेली आहे. आम्ही न्यायालयात लढतोय. पोलिसी बळावर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य या शेतकऱ्यांच्या भूसंपादन न झालेल्या व एक पैशाचाही मोबदला न मिळालेल्या ४२ गुंठे जमिनीवर अतिक्रमण आजही होत असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे.
कै. उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) या दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल ४२ गुंठे जागेचे भूसंपादन न होता एक पैशाचाही मोबदला न मिळता ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद अधिकारी वाटोळे करत आहेत. उद्या या शेतात पाणी साचून राहील्यास, पिकांचे नुकसान झाल्यास तसेच पाण्याचे तळे होऊन जमिन भिजाट झाल्याने शेतीचे नुकसान झाल्यास विद्यमान सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, रस्ते कामाचा कंत्राटदार आणि जिल्हा परिषद अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन या शेतकऱ्यांच्या ४२ गुंठे जागेची आणि उर्वरित साडे चार एकर जमिनीच्या भिजाट जमिनीची नुकसान भरपाई देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. या घटनेमुळे कै. उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) या वयोवृद्ध शेतकऱ्यांचे परिवार भीतीच्या छायेखाली व मानसिक ताणाखाली वावरत आहेत. या वयोवृद्ध शेतकऱ्यांना व त्यांच्या पत्नीला विविध आजार आहेत. त्यामुळे या घटनेचा व गावपुढाऱ्याच्या दहशतीखाली पोलिस बंदोबस्तात भूसंपादन न झालेल्या जागेवर व एक पैशाचाही मोबदला न मिळता अतिक्रमण होत आहे. न्यायालयीन प्रकरण खटला सुरू असून जुलै महिन्यात आगामी तारीख आहे. तरीही केस जिंकल्याचे सांगत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य खुलेआमपणे प्रसिद्धी माध्यमांना खोटी माहिती देत आहेत. या प्रकरणात कोणी दगावल्यास त्यास सर्वस्वी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य जबाबदार राहतील. आपण संबंधित कै. उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीवरील विनाभूसंपादन शासकीय अतिक्रमण काढण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. पोलीस बंदोबस्तात विना भूसंपादन शेतात अतिक्रमण करणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून केली आहे.
या सरपंचाच्या घराजवळून जुन्नरकडे जाणारा रस्ता अधिकृत आहे. या रस्त्याची कागदोपत्री नोंदही आहे. भूसंपादन झालेले आहे. तथापि या ठिकाणी रस्ता न बनविता केवळ राजकीय पाठबळावर व मंत्री गिरीश महाजन यांच्या बंदोबस्ताला गावातील एक पोलीस अधिकारी असल्याने हा दडपशाहीचा प्रकार सुरु आहे. सरपंचाच्या घराजवळील भूसंपादन झालेल्या रस्त्याची डागडूजी करण्यात यावी. हा रस्ता थेट जुन्नरपर्यत जातो. हा रस्ता अधिकृत आहे. भूसंपादन झालेले आहे. सरपंचाची जमीनही येथेच आहे. त्या जमिनीतून रस्ता काढून सरपंचांनी दिलासा द्यावा. आपण याप्रकरणी लवकरात लवकर संबंधितांना निर्देश देवून कै. उत्तम विष्णू खांडगे (वय वर्षे ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्षे ७१) या वयोवृद्ध शेतकऱ्यांवर झालेला अन्याय पाहता आपण विषयाचे गांभीर्य समजून घ्यावे आणि हे अतिक्रमण हटविण्याचे जिल्हा परिषदेला निर्देश द्यावेत. तसेच १) विनाभूसंपादन शेतीवर शासकीय अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या परिवाराला न्याय मिळणार काय?
२) कोणत्याही प्रकारचे भूसंपादन न करता शेतावर अतिक्रमण करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
३) न्यायालयात केस सुरू असतानाही शेतकरी परिवार केस हरल्याचे सोशल मिडियावर (यू ट्यूब) अफवा पसरवणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचावर फौजदारी गुन्हा लवकरात लवकर दाखल करून त्यांची मालमत्ता जप्त करणेबाबत आपण संबंधितांना निर्देश देवून आपण जनकल्याणकारी मुख्यमंत्री आहात, हे कृतीतून दाखवून द्यावे.
४) आमच्या शेतातील ४२ गुंठे जमिनीवरील अतिक्रमण तातडीने हटवावे व सरपंचाच्या घराजवळून जाणाऱ्या अधिकृत रस्ता (या रस्त्याची शासकीय पातळीवर कागदोपत्री नोंद आहे, भूसंपादनही झालेले आहे.) बनवून तो जुन्नरला जाण्यासाठी वापरण्यायोग्य करावा.
५) गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य शेतात अतिक्रमण करण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस बंदोबस्तासाठी आणतात व आमच्या परिवाराची पोलिसी बळापुढे मुस्कटदाबी करून अतिक्रमणची डागडूजी करतात. हा प्रकार थांबला पाहिजे. पोलीस संरक्षण देणे यापुढे थांबवा. शेतात भूसंपादन झाल्याचे कागद दाखविल्याशिवाय पोलीस पाठवू नयेत. पोलीस संरक्षणात गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अतिक्रमण खुलेआमपणे करतात. न्यायालयात केस सुरू असताना खांडगे कंपनी केस हारली असल्याचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य बिनधास्तपणे खोटे बोलत सोशल मिडियावर (यूट्यूब) प्रतिक्रिया देत खोटे सांगतात. न्यायालयाचा खुलेआमपणे खोटे बोलून अपमान करत असताना या लोकांना राज्याचा गृहविभाग पोलीस संरक्षण कशासाठी देत आहे? यापुढे आमच्या शेतातील अतिक्रमणासाठी पोलीस बंदोबस्त न देण्याचे आपण स्थानिक नारायणगाव पोलीस स्टेशनला आदेश द्यावेत, तसेच हे अतिक्रमण काढून टाकण्याचे जिल्हा परिषदेला तातडीने निर्देश द्यावेत तसेच भूसंपादन झाल्याशिवाय, केस निकाली निघाल्याशिवाय व शेतकऱ्यांना ४२ गुंठे शेताचा मोबदला मिळाल्याशिवाय अतिक्रमणासाठी पोलीस बंदोबस्त आपण उपलब्ध करून देवू नये यासाठी आपण संबंधिंताना निर्देश देण्याची मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.

Previous Post

श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 25 हजार किलो  लाडूच्या प्रसादाचे वाटप होणार

Next Post

भारतीय कामगार आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणिसपदी सुहासिनी नायडू

Next Post
भारतीय कामगार आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणिसपदी सुहासिनी नायडू

भारतीय कामगार आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणिसपदी सुहासिनी नायडू

नेरूळच्या आगरी-कोळी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

नेरूळच्या आगरी-कोळी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाड्यात रविवारी रंगणार नवी मुंबई नमो केसरी कुस्ती स्पर्धा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com