• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 15, 2024

प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या डिपॉझिटमध्ये घट : आशिष शेलार

adminbyadmin
in मुंबई
0
प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या डिपॉझिटमध्ये घट : आशिष शेलार

मुंबई : ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील बिल्डरांना केलेला ५० टक्के प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या डिपॉझिटमध्ये घट झाली, असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अशी शेलार यांनी येथे केला. महायुतीतर्फे मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा सभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आमदार शेलार यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 

तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार कुठे भेटतील का? म्हणून वरळीतील लोक त्यांना शोधत आहेत. वरळीतून आमदार गायब, अशी स्थिती आहे. यांचे विमान कधी जमिनीवर येतच नाही, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेतला जोरदार टीका केली.

मुंबई महापालिकेची डिपॉझिट कमी झाली म्हणून आता ओरडत आहेत. शिंदे सरकार आल्यानंतर विकास कामे सुरू झाली, विकास कामांना निधी वापरला गेला. त्यामुळे मालमत्तांमध्ये साडेचौदा टक्के वाढ झाली. पुल उभे राहिले, रस्ते उभे राहिले.  डिपॉझिट कमी होण्याचे खरे कारण तत्कालीन ठाकरे सरकारने बिल्डरांवर ५० टक्के प्रीमियम माफीची खैरात केली. त्यामुळे महापालिकेतील तिजोरीत येणारा निधी आला नाही आणि त्यामुळेच महापालिकेचे डिपॉझिट कमी झाले, असा आरोपी आमदार अशी शेलार यांनी केला. दोन्ही मेळाव्याला महायुतीच्या सर्व पक्षांचे आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल लिहलेल्या पत्राविषयी बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, आज लवकर सकाळी उठल्यामुळे त्यांची डोळ्यावरची झोप आणि झडप गेली नसावी म्हणून उद्धव ठाकरे यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. संजय राऊत यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट मुद्दामहून अडचणीत आणणारी आणि चुकीची दिलेली असावी. उद्धव ठाकरे आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या ट्विटर हँडलवर जरी केले असते तरी त्यांना दिसले असते की, कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे २४ तासानंतर जागे झाले आहेत. त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोहोचले आहे. यांनी सांगण्याची काही गरज नाही. यांच्या सांगण्यावरून कुणाला आम्ही निमंत्रण देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही.

Previous Post

अपघातग्रस्त दुचाकीस्वाराच्या मदतीला धावले आमदार नितेश राणे

Next Post

रहीवाशांना मालमत्ता कराच्या पावत्या वेळेवर द्या : विद्या भांडेकर

Next Post
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

रहीवाशांना मालमत्ता कराच्या पावत्या वेळेवर द्या : विद्या भांडेकर

नागरिक सुरक्षित कारण सीमेवर सैनिकांचा जागता पहारा : जिल्हाध्यक्ष संदीप नाईक

नागरिक सुरक्षित कारण सीमेवर सैनिकांचा जागता पहारा : जिल्हाध्यक्ष संदीप नाईक

श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 25 हजार किलो  लाडूच्या प्रसादाचे वाटप होणार

श्रीरामललाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त 25 हजार किलो  लाडूच्या प्रसादाचे वाटप होणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com