• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 16, 2022

कॉंग्रेसच्या मागणीमुळे महापालिकेने केला ‘इंडियन स्वच्छता लीग’चा कार्यक्रम स्थगित

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
फेस्टीव्हल अॅडव्हान्ससह विशेष भत्यासाठी इंटक आग्रही

जीवन गव्हाणे

नवी मुंबई :  १७ सप्टेंबर रोजी नेरूळ सेक्टर २६ येथील गणपतशेठ तांडेल मैदान तसेच सीबीडी बेलापुर येथील सुनील गावसकर क्रिडागणावर सकाळी ८ ते ११ या वेळेत संपन्न होणाऱ्या ‘इंडियन स्वच्छता लीग’च्या विशेष कार्यक्रमात शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग न  करणेबाबत तसेच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली होती. महापालिका प्रशासनाने त्या मागणीवर नियोजित ‘इंडियन स्वच्छता लीग’चा कार्यक्रम अतिवृष्टीचे कारण देत स्थगित केला आहे. कॉंग्रेसचे नेरूळ ब्लॉक अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या लेखी मागणीवर महापालिका प्रशासनाने काही मिनिटातच कार्यक्रम स्थगित केल्याने महापालिका मुख्यालयात उलटसूलट चर्चा सुरू आहे.

१७ सप्टेंबर रोजी नेरूळ सेक्टर २६ येथील गणपतशेठ तांडेल मैदानात तसेच सीबीडी बेलापुरमधील सुनील गावसकर क्रिडांगणावर सकाळी ८ ते ११ या वेळेत संपन्न होणाऱ्या ‘इंडियन स्वच्छता लीग’च्या विशेष कार्यक्रमात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून इतर युवकांनीही याप्रसंगी स्वयंस्फुर्तीने उपस्थित राहून राष्ट्रीय स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने यात सहभागी होण्यासाठी प्रसिध्दी माध्यमांतून तसेच सोशल मिडियातून नवी मुंबईकरांना महापालिका प्रशासनाने आवाहनही केले आहे. कार्यक्रमामध्ये पाम बीच रोड तथा राजीव गांधी स्टेडियम येथे मानवी साखळी व इतर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाकरिता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मनपा शाळा व इतर खाजगी शाळेतील विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाकरीता महिला बचत गटाच्या सदस्यांनाही निमंत्रित केले आहे. महिलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसात भिजल्यावर साथीच्या आजारांची लागण होण्याची भीती आहे. या बचत गटातील महिला व विद्यार्थ्यांची मानवी साखळी करून त्यायोगे जनजागृती करणे प्रशासनाला अभिप्रेत आहे. कुठलीही रॅली मोर्चा आंदोलने व जनजागृतीपर सभा यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा वापर करण्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा प्रतिबंध घातलेला असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

कोरोना महामारी नियत्रंणात असली तरी या महामारीचे अजूनही पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही. अशा सार्वजनिक कार्यक्रमातील गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची व बचत गटातील महिला तसेच मुलांना संसर्ग होण्याची भीती आहे. गेली काही दिवस पडत असलेल्या मुसलधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टीचा इशारा दिलेले असताना व भयंकर पाऊस पडत असताना अशा प्रकारचे रॅलीचे आयोजन करणे हे अत्यंत चूक आहे आपण आपल्या स्वच्छतेच्या ‘निश्चय केला नंबर पहिला’ राबविताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनाखुश करण्यासाठी महापालिका प्रशासनाने शालेय व महाविद्यालयीन मुलांना वेठीस धरणे योग्य नाही.  सध्या पावसामुळे नेरूळमधील गणपतशेठ तांडेल मैदान व सीबीडी बेलापुरमधील सुनील गावस्कर क्रिडांगण चिखळाने माखलेले आहे. त्या ठिकाणी डासांचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कार्यक्रम एक दिवसाचा होईल, प्रशासनाला शाबासकीही मिळेल, पण मुलांना डासांमुळे साथीच्या आजाराची लागण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्नही रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाला विचारला होता.

देशामध्ये स्वच्छतेत प्रथम क्रमांक आणण्यासाठी महापालिका प्रशासन करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहे. परंतु आपण पहिला नंबरसाठी प्रयत्न करताना बाराही महिने आपली नवी मुंबई स्वच्छ कशी राहील याकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. या अनुषंगाने  नवी मुंबईतील गाव, गावठाण, झोपडपट्ट्या, वाड्या-वस्त्या, पुलाखालील असंरक्षित वस्त्या यांच्या स्वच्छतेकडे प्रकर्षाने लक्ष दिले पाहिजे.  महापालिका कर्मचारी व अधिकारी नवी मुंबईतील शहरी व ग्रामीण हा भेदभाव न करता विकासामध्ये व समस्या निवारणामध्ये सातत्याने समतोल राखत आहेत. परंतु पालिका प्रशासनाने राज्य व केंद्र पातळीवरील वरिष्ठांची शाबासकी मिळविण्यासाठी मुसळधार पावसात व कोरोनाच्या सावटात अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे उचित नाही. जनजागृतीपर कार्यक्रमाचे पालिका प्रशासनाने निश्चितच आयोजन करावे, पंरतु अशा कार्यक्रमासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर करू नये. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. उद्याची अतिवृष्टीची शक्यता पाहता पालिका प्रशासनाने हा कार्यक्रमच रद्द करावा अशी मागणी रविंद्र सावंत यांनी केली होती.

रविंद्र सावंत यांच्या मागणीनंतर महापालिका प्रशासनाने हा कार्यक्रम अतिवृष्टीचे कारण देत स्थगित केल्याने महापालिका मुख्यालयात नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी असलेला हा कार्यक्रम कॉंग्रेसच्या मागणीमुळे स्थगित झाला असल्याची चर्चा सुरू आहे.

Previous Post

प्रभाग ३० मध्ये धुरीकरण अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post

खारघर एनआयएफटीमध्ये नझम-ए-हसरत ऑनलाइन गीत लेखन कार्यशाळा

Next Post
खारघर एनआयएफटीमध्ये नझम-ए-हसरत ऑनलाइन गीत लेखन कार्यशाळा

खारघर एनआयएफटीमध्ये नझम-ए-हसरत ऑनलाइन गीत लेखन कार्यशाळा

वेतनासाठी उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

वेतनासाठी उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

मुख्यमंत्री महोदय, वेतन थकलेल्या माळी कामगारांना न्याय द्या: ठेकेदारांवर कारवाई करण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com