• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 25, 2019

विधान परिषदेतील लक्षवेधीमुळे ठोक मानधनावरील कामगार उत्साही

adminbyadmin
in Uncategorized
0
उद्या सकाळी ९ वाजता महापालिकेत स्थायी समितीची सभा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या व ठोक मानधनावरील कामगारांच्या व्यथांना कोणी वाली नसल्याने ठेकेदाराच्या राजवटीत त्यांना आजही हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. महापालिकेत ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची सेवा कायम करावी यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत गेली काही वर्षे पाठपुरावा करत आहेत. या पाठपुराव्याची दखल घेत नागपुर अधिवेशनात आमदार जोगेंद्र कवाडे यांनी विधान परिषदेत या कामगारांसाठी लक्षवेधी मांडत नवी मुंबई महापालिकेत ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांच्या समस्येकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.

नवी मुंबई महापालिका वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे एका लेखी निवेदनातून नुकतीच केली होती. याबाबत सादर केलेल्या निवेदनात रवींद्र सावंत यांनी ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांची व्यथा मांडत त्या कामगारांना आता मंत्रालयीन पातळीवरून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.

नवी मुंबई महापालिका प्रशासनात गेल्या अनेक वर्षांपासून कामगार ठोक मानधनावर काम करत आहेत. वर्षानुवर्षे महापालिका प्रशासनात काम करूनही त्यांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. नागरी सुविधा पुरविण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे काम करूनही त्यांची सेवा आजतागायत कायम झालेली नाही. नागरी सुविधा पुरविण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे काम हे ठोक मानधनावरील कामगार इमानेइतबारे करत आहेत. महापालिका प्रशासनाला राज्य व केंद्र सरकारकडून सातत्याने पुरस्कार प्राप्त होत आहेत. त्यामध्ये या ठोक मानधनावरील काम करणाऱ्या कामगारांचे योगदान फार मोठे आहे. वर्षानुवर्षे महापालिका प्रशासनात काम केल्यामुळे त्यांचे वय वाढले आहे. परिणामी अन्यत्र कोठेही त्यांना रोजगार भेटू शकत नाही. महापालिका प्रशासनाकडून संबंधित कामगारांना कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही अथवा तातडीने कोणतीही वैद्यकीय मदतही त्यांना मिळत नाही, ही खरी शोकांतिका आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने ठोक मानधनावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना, नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यांची मुलाखत घेतलेली आहे व मुलाखतीत या कामगारांची निवड केलेली आहे. हे कर्मचारी मागच्या दरवाजाने नियुक्त केलेले आहेत, हा नवी मुंबई महानगरपालिकेकडून केलेला युक्तीवाद चुकीचा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेवून मागील दाराने नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यास नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कायम करता येणार नाही, ही सबब चुकीची आहे. म्हणून ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची सेवा मुंबई महानगरपालिकेने सन १९९७-९८ मध्ये ज्या धर्तीवर ठोक मानधनावर काम करणाऱ्या तात्पुरत्या कर्मचाऱ्याची सेवा नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवर कायम करून न्याय द्यावा व प्रस्तावित केल्यानुसार सदरच्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ठेकेदाराच्या आस्थापनेवर काम करण्यास भाग पाडू नये अन्यथा इंटकला याबाबत दीर्घकालीन लढाई उभारावी लागेल असा इशारा नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी निवेदनातून दिला होता.

ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा कायम करण्याऐवजी या सर्व कामगारांना पालिका प्रशासन एकच ठेकेदार नेमून ती सेवा त्या ठेकेदाराच्या माध्यमातून उपलब्ध करून घेणार आहे. ठेकेदाराचे पोट भरण्यासाठी आता नव्याने ठोक मानधनावरील कामगारांची ससेहोलपट करून घेण्याचे हे षडयंत्र असल्याचा संताप संबंधित कामगारांकडून व्यक्त केला जात आहे. या कामगारांनी आजमितीला गृहकर्ज घेतले आहे. मुलांच्या शिक्षणावर खर्च सुरू आहे. कोणी घराचे भाडे भरत आहेत. महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनात आपली व आपल्या परिवाराची उपजिविका हे ठोक मानधनावरील कामगार चालवित आहेत.या कामगारांचे ठोक मानधनावरील सेवेचे कायम सेवेत रूपांतर झाल्यास त्यांना महापालिका प्रशासनाकडून अन्य कामगारांप्रमाणे वेतन व अन्य सोयीसुविधाही उपलब्ध होतील, ठोक मानधनावर काम करणारे कामगार आज अंत्यत हलाखीच्या परिस्थितीत काम करत आहेत. पालिका प्रशासनाची वर्षानुवर्षे इमानेइतबारे सेवा करणाऱ्या ठोक मानधनावरील कामगारांचा आता गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य पाहता, नवी मुंबई महापालिका प्रशासनाला ठोक मानधनावर काम करणाऱ्या कामगारांची सेवा कायम करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी निर्देश द्यावेत अशी मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केली होती.

नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत हे सातत्याने मंत्रालयीन पातळीवर ठोक मानधनावरील कामगारांच्या कायम सेवेसाठी दावपळ करत असल्याचे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी त्यांच्या परिश्रमाची दखल घेत विधान परिषदेत या विषयावर लक्षवेधी मांडली. विधान परिषदेत आपला मुद्दा लक्षवेधीतून उपस्थित झाल्याने संबंधित कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांचे त्यांनी आभारही मानले आहेत.

Previous Post

ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे कर्नाळा बँकेला निर्देश देण्याची मागणी

Next Post

विखेंच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाहीः मंत्री ना.बाळासाहेब थोरात

Next Post
विखेंच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाहीः मंत्री ना.बाळासाहेब थोरात

विखेंच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाहीः मंत्री ना.बाळासाहेब थोरात

उद्या सकाळी ९ वाजता महापालिकेत स्थायी समितीची सभा

आरक्षण सोडतीबाबत लवकर निर्णय घ्या, अफवांनी जीव गुदमरतोय…

संभाव्य बोगस मतदान नोंदणी प्रक्रियेला आळा घालण्याची कॉंग्रेसची मागणी

संभाव्य बोगस मतदान नोंदणी प्रक्रियेला आळा घालण्याची कॉंग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com