• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 24, 2019

ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे कर्नाळा बँकेला निर्देश देण्याची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे कर्नाळा बँकेला निर्देश देण्याची मागणी
  • शिष्टमंडळाची आरबीआयकडे आग्रही मागणी 
    पनवेल : राजेंद्र पाटील
  • कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरु आहे, त्या अनुषंगाने शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. २४) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा करून कर्नाळा बँकेने ठेवीदारांना पैसे परत करावेत, यासाठी आरबीआयने कर्नाळा बँकेला निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी केली. 
  •  या शिष्टमंडळात खासदार गोपाळ शेट्टी, माजी खासदार किरीट सोमैय्या, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, आमदार अमित साटम, कुंडलिक काटकर यांचा समावेश होता.   ठेवीदारांचे पैसे देण्यास कर्नाळा नागरी सहकारी बँक असमर्थ ठरल्याने ठेवीदार, खातेदार चिंतेत आहेत, त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती सक्रीयपणे कार्यरत आहेत मात्र कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ झोपेचे सोंग घेऊन बिनधास्त उत्तरांची टोलवाटोलवी करत आहे. शेकडो ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत गुंतवली त्यामुळे ठेवीदारांना आपल्या कुटुंबाच्या आयुष्याची चिंता वाढू लागली आहे. तर दुसरीकडे अनेक क्लुप्त्या करून ठेवीदारांना वारंवार फसविण्याचे काम बँक करीत आहे. स्थानिक बँक म्हणून गोरगरिबांनी जागा जमीन विकून आपल्या कष्टाची आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत जमा केली. परतावा म्हणून त्यांचे पैसे वेळेवर देणे क्रमप्राप्त होते मात्र बॅँकेतीलच मंडळींनी घोटाळा करून सर्वसामान्य माणसाचा पैसा हडप केला. त्यामुळे अत्यंत बिकट व संकटकालीन परिस्थिती ग्राहकांची झाली आहे. दहा लाख रुपये बँकेत असणाऱ्या ठेवीदारांना दहा खाती उघडण्याचे सांगत प्रत्येक खात्यावर एक लाख रुपये देण्याचे वेळमारु आश्वासन दिले जात आहे. नुसते पोकळ आश्वासन देण्यापेक्षा दिलेल्या मुदतीप्रमाणे बँकेने ठेवीदारांचे पैसे येत्या पंधरा दिवसात ठेवीदारांना परत करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली व आरबीआयने त्यांना तशा सूचना द्याव्यात. अशीही मागणी यावेळी करण्यात आली. 

Previous Post

एकवीरा देवस्थानाकडे जाणाऱ्या पायऱ्याची डागडूजी करण्याची मनोज मेहेरची मागणी

Next Post

विधान परिषदेतील लक्षवेधीमुळे ठोक मानधनावरील कामगार उत्साही

Next Post
उद्या सकाळी ९ वाजता महापालिकेत स्थायी समितीची सभा

विधान परिषदेतील लक्षवेधीमुळे ठोक मानधनावरील कामगार उत्साही

विखेंच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाहीः मंत्री ना.बाळासाहेब थोरात

विखेंच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाहीः मंत्री ना.बाळासाहेब थोरात

उद्या सकाळी ९ वाजता महापालिकेत स्थायी समितीची सभा

आरक्षण सोडतीबाबत लवकर निर्णय घ्या, अफवांनी जीव गुदमरतोय…

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com