• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2018

समृध्दी महामार्गावरील कमाल वेग मर्यादा ताशी १२० किलोमीटर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
समृध्दी महामार्गावरील कमाल वेग मर्यादा ताशी १२० किलोमीटर

 मुंबई : महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या समृध्दी महामार्गावरील कमाल वेग मर्यादा ताशी १२० किलोमीटर ठरवण्यात आली आहे. यादृष्टीनेच प्रकल्पाच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, भारतात बनवण्यात येणाऱ्या गाड्यांचे डिझाइन पाहून वेगमर्यादा निश्चित करण्याची सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. सह्याद्री अतिथी गृहावर रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक झाली. चर्चेदरम्यान नियोजित समृद्धी महामार्गावरील वेग मर्यादेबाबत त्यांनी ही सूचना केली.

नागपूर ते मुंबई दरम्यान प्रस्तावित समृद्धी महामार्गावर करावयाच्या रस्ते सुरक्षाविषयक उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी अधिक वेगमर्यादा निश्चित करण्यात आली  आहे. त्या वेगमर्यादेइतकी अत्याधुनिक वाहने आपल्याकडे आहेत का, याचा विचार करण्यात यावा, असे रावते यांनी सुचविले. समृद्धी महामार्ग ७०० किलोमीटरचा असून मुंबई ते नागपूर हे अंतर आठ तासात पूर्ण करावयाचे उद्दिष्ट ठेवून प्रकल्पाची आखणी करण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या मार्गाचा आढावा घेऊन वेग मर्यादेत आवश्यक असल्यास बदल केला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने ईनाडूशी बोलताना सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै २०१५ला समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. हा  प्रकल्प  जानेवारी २०१८ मध्ये सुरु होणे अपेक्षित होते. मात्र जमीन संपादन आणि स्थानिक  गावांचा विरोध असल्याने या प्रकल्पाला उशीर झाला आहे. प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपालवर यांची नियुक्ती केली आहे. येत्या दोन महिन्यात या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रकल्पासाठी ४६,००० कोटी रुपयांचा एकूण खर्च प्रस्तावित आहे. समृद्धी महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर केवळ आठ तासात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

राष्ट्रवादीच्या महिलांकडून मातोश्रीसमोर उध्दवविरोधी घोषणा

Next Post

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला तिरंगी झळाळी

Next Post
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला तिरंगी झळाळी

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला तिरंगी झळाळी

अपघाती मृत्यूच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

अपघाती मृत्यूच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

आ. मंदा म्हात्रे यांच्या  प्रयत्नाने  285 गाळ्यांचा 9 वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी

आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने 285 गाळ्यांचा 9 वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com