• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 14, 2018

अपघाती मृत्यूच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

adminbyadmin
in मुंबई
0
अपघाती मृत्यूच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई : सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या रस्ते सुरक्षा परिषदेदरम्यान राज्यातल्या रस्ते अपघातांचा आढावा घेतला. राज्यातील ६६ टक्के अपघाती मृत्यू हे मोटारसायकल, सायकल आणि पादचाऱ्यांच्या अपघातातील आहेत. अपघाती मृत्युंच्या संख्येत देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. २०१३ च्या तुलनेत मागील वर्षी राज्यातील अपघातांची संख्या ही १०.५ टक्क्यांनी कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीत नुकत्याच झालेल्या आंबेनळी घाटातल्या अपघाताबाबतही चर्चा झाली. राज्यातील घाटांमधील वाढते अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. समितीमध्ये संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रस्ता संरक्षणातील तज्ज्ञ आदींचा समावेश करण्यात यावा आणि समितीने सहा महिन्यात शासनास अहवाल सादर करावा, अशा सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिल्या.

राज्यातल्या रस्ते अपघातांचाही आढावा घेण्यात आला. राज्यात महामार्गांची संख्या १५ टक्के असली तरी महामार्गांवरील अपघातांची संख्या मात्र ५७ टक्के इतकी आहे. इतर मार्गांवरील अपघातांची संख्या ही ३३ टक्के इतकी आहे, अशी माहिती दिली. रावते म्हणाले की, रस्त्यांचा दर्जा सुधारला की त्यावर चालणाऱ्या वाहनांचा वेग वाढतो. महामार्गांवरील रस्ते अपघातामध्ये वाहनांचा अतिवेग हे एक प्रमुख कारण ठरत आहे. हे रोखण्यासाठी परिवहन, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक पोलीस आदींनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे.

परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त दिपाली मासिरकर, समृद्धी महामार्गाचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोसा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, संबंधित विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Previous Post

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला तिरंगी झळाळी

Next Post

आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने 285 गाळ्यांचा 9 वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी

Next Post
आ. मंदा म्हात्रे यांच्या  प्रयत्नाने  285 गाळ्यांचा 9 वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी

आ. मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने 285 गाळ्यांचा 9 वर्षापासुनचा प्रलंबित प्रश्न मार्गी

लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच होणारः खा. अशोक चव्हाण

लाल किल्ल्यावरुन मोदींचे हे शेवटचेच भाषण, पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच होणारः खा. अशोक चव्हाण

शिरवणे येथे दैनंदिन बाजार इमारतीचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन

शिरवणे येथे दैनंदिन बाजार इमारतीचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com