• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2018

मराठा क्रांती मोर्चाविरुद्धची याचिका मागे घेणार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मराठा आंदोलनातून नवी मुंबईला वगळले

मुंबई – मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांनी केलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे मराठा आंदोलनाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका मागे घेण्यात येणार असल्याचे याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील आणि त्यांचे वकील आशिष गिरी यांनी सांगितले. मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी तोडफोडीच्या घटनांची दखल घेतली आहे. तसेच रस्त्यावर उतरुन आंदोलन न करण्याचेही आश्वासन दिले, त्यामुळे ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. 

ऑगस्ट क्रांतीदिनी सकल मराठा समाजाकडून राज्यभर बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये मुंबई, ठाणे वगळता संपूर्ण महाराष्ट्राने सहभाग नोंदवला. मात्र, या मराठा समाजाच्या या बंद आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. अनेक जिल्ह्यात एसटी बसेस आणि पोलीस गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तर औरंगाबाद एमआयडीसीतील 50 ते 60 कंपन्यांमध्ये धुडगूस घालण्यात आला. या घटनेने महाराष्ट्राचे आणि समाजाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळेच द्वारकानाथ पाटील यांनी आंदोलनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. 

 महाराष्ट्रात बंद पुकारणाऱ्या मराठा संघटना आहेत, मात्र हिंसाचार करणारे कोण आहेत? त्यांना शोधावे आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी. सन 2003 मध्ये शिवसेना आणि भाजपने बंद पुकारला होता. त्यावेळी कायद्यातील तरतुदींनुसार दोन्ही पक्षांना 25 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तशाच प्रकारे कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन राज्यभरातील नुकसानाबाबत मराठा आंदोलनास दंड ठोठावता येऊ शकतो. तर, सर्व आंदोलकांना कलम 149 अंतर्गत नोटीसा बजावल्या गेल्या पाहिजेत, असे या याचिकेत म्हटले होते. मात्र, 13 ऑगस्ट रोजी ही याचिका मागे घेण्यात येणार आहे. 

दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनात काही बाह्य शक्तींनी शिरकाव केला होता. या आंदोलनात हिंसात्मक कृती करणारे मराठे नसून समाजकंटक होते, असे मराठा समाजाच्या समन्वयक समितीने म्हटले आहे. तसेच यापुढे रस्त्यावर उतरुन आंदोलन होणार नसल्याचेही समितीने जाहीर केले. 

Previous Post

सारसोळे महापालिका शाळेजवळील डेब्रिज तात्काळ उचलण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

Next Post

तपासाच्या नावाखाली एटीएसकडून चौघांचा छळ; सनातनचे वकील पुनाळेकर यांचा आरोप

Next Post
तपासाच्या नावाखाली एटीएसकडून चौघांचा छळ; सनातनचे वकील पुनाळेकर यांचा आरोप

तपासाच्या नावाखाली एटीएसकडून चौघांचा छळ; सनातनचे वकील पुनाळेकर यांचा आरोप

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

हिंसक कारवायांत गुंतलेल्या सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषीत कराः खा. अशोक चव्हाण

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोच्या 14,838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन नोंदणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 ऑगस्ट  रोजी शुभारंभ – लोकेश चंद्र

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोच्या 14,838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन नोंदणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 ऑगस्ट रोजी शुभारंभ – लोकेश चंद्र

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com