• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2018

हिंसक कारवायांत गुंतलेल्या सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषीत कराः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

मुंबई : अनेक हिंसक कारवायात गुंतलेल्या सनातन संस्थेच्या एका साधकाच्या घरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने 8 जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. यावरून सनातन संस्था मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे. या अगोदरही बॉम्बस्फोट आणि विचारवंताच्या हत्येप्रकरणात वेळोवेळी सनातनशी संबंधित लोकांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषीत करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना खा. अशोक चव्हाण म्हणाले की, दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेला वैभव राऊत हा सनातन संस्थेचा साधक आहे. तो हिंदू गोवंश रक्षा समितीच्या मार्फत काम करतो. त्याने सनातन संस्थेशी संबधित व्यासपीठावर वेळोवेळी अनेक सभा पत्रकारपरिषदांमध्ये अग्रणी राहून भाग घेतलेला आहे. या अगोदर मालगोंडा पाटील, समीर गायकवाड, विरेंद्र तावडे या सर्वांबरोबरच डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेक-यांचा संबंधही सनातन संस्थेशीच आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच केंद्राकडे या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. परंतु मोदी सरकारने अद्यापही त्यावर कारवाई केली नाही. किंबहुना सनातन संस्थेचे पदाधिकारी मंत्रालय आणि विधीमंडळात मुक्त संचार करित असून ते सरकारच्या संपर्कात आहेत हे स्पष्ट आहे. देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून भाजपच्या धर्मांध राजकारणाला पूरक असणा-या सनातनसारख्या कट्टरतावादी संघटनांना मोकळे रान मिळालेले आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांनीही कट्टरवादी संघटनांचा मालेगाव सारख्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड केले होते. मात्र आज भाजप सरकारच्या कार्यकाळात या प्रकरणातील आरोपींना कायद्यातून संरक्षण देऊन निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र देण्याचा संतापजनक प्रकार सुरु आहे. या वेळेसही अशाच त-हेचे बोटचेपे धोरण हे सरकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. सनातनच्या साधकांनी बॉम्बस्फोट घडवण्याआधी सनातनवर कारवाई करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous Post

तपासाच्या नावाखाली एटीएसकडून चौघांचा छळ; सनातनचे वकील पुनाळेकर यांचा आरोप

Next Post

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोच्या 14,838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन नोंदणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 ऑगस्ट रोजी शुभारंभ – लोकेश चंद्र

Next Post
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोच्या 14,838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन नोंदणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 ऑगस्ट  रोजी शुभारंभ – लोकेश चंद्र

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोच्या 14,838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन नोंदणीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 ऑगस्ट रोजी शुभारंभ – लोकेश चंद्र

महापालिका मधील कंत्राटी कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावणार :  आमदार मंदाताई म्हात्रे यांची कंत्राटी कामगारांना ग्वाही

महापालिका मधील कंत्राटी कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावणार : आमदार मंदाताई म्हात्रे यांची कंत्राटी कामगारांना ग्वाही

वीर सावरकर उड्डाण पुलाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपात श्रेयवादाची लढाई

वीर सावरकर उड्डाण पुलाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपात श्रेयवादाची लढाई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com