• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 20, 2018

आव्हाडांनी कृष्णकुंजला का भेट दिली? याचीच चर्चा

adminbyadmin
in मुंबई
0
आव्हाडांनी कृष्णकुंजला का भेट दिली? याचीच चर्चा

दिपक देशमुख
मुंबई – समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी साद घालून भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे जाहीर आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेले असतानाच, त्यांचे खास शिलेदार मानले जाणारे जितेंद्र आव्हाड बुधवारी ’कृष्णकुंज’वर पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आव्हाड यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला, तरी ही केवळ सदिच्छा भेट नव्हती, याबद्दल राजकीय वर्तुळात दुमत नाही.
लोकसभा निवडणुकीला वर्ष शिल्लक असले तरी देशभरात सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी, जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजपाविरोधी सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी काही प्रमुख नेते सक्रिय झाले आहेत आणि त्यात शरद पवार सगळ्यात पुढे आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेलाही महाआघाडीसोबत येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यांची ही ऑफर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी वर्धापनदिन मेळाव्यात नाकारली होती. त्यानंतर बुधवारी लगेचच जितेंद्र आव्हाड सकाळी-सकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले.
वास्तविक, राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड आजवर अनेकदा शाब्दिक चकमक उडाली आहे. काही वर्षांपूर्वी, राज ठाकरे हा नेता नव्हे, तर कॉमेडियन आहे, अशी खिल्ली आव्हाडांनी उडवली होती. त्याला राज यांनीही आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिले होते. परंतु, अलीकडच्या काळात त्यांच्यात स्नेहबंध जुळताना दिसू लागले होते. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवल्यानंतर, आव्हाड यांना त्यांच्यातील विविध गुणांची जाणीव होऊ लागल्याचे दिसत आहे.
राज ठाकरे यांचा व्यासंग, विविध विषयांचा अभ्यास कौतुकास्पद आहे. त्यांनी नाट्यसंमेलनात केलेले भाषणही प्रभावित करणारे होते. त्यामुळे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर मस्त गप्पा रंगल्या, असे जितेंद्र आव्हाड यांनी राज यांच्या भेटीनंतर सांगितले. राजकीय विषयावर नेमके काय बोलणे झालेले, याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. परंतु, पवारांच्या अनाकलनीय राजकारणाचा विचार करता, या भेटीमागे काय ’राज’ असेल, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राजकारणात कधीच कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, या वाक्याची प्रचिती आता निवडणुका होईपर्यंत येतच राहणार आहे. परंतु, ही भेट राजकीय नसून वैयक्तिक कारणांसाठी होती, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांना दिली.

Previous Post

मुंबईतील अतिधोकादायक ७०७ इमारती केव्हाही कोसळणार

Next Post

‘सेल्फी’साठी शिवसैनिकाना नार्वेकरंच हवेत

Next Post
‘सेल्फी’साठी शिवसैनिकाना नार्वेकरंच हवेत

‘सेल्फी’साठी शिवसैनिकाना नार्वेकरंच हवेत

स्वत:चे अनधिकृत बांधकाम पाडण्याची महापालिकेवर नामुष्की

महापालिकेने स्वत:च उभारून स्वत:च पाडलेल्या अनधिकृत मार्केटचे डेब्रिज तात्काळ उचलण्याची मागणी

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

लोकांना खायला अन्न नाही, आणि मोदी म्हणतात योग कराः खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com