• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 11, 2018

राज्यात हवेवर आलेले, हवेतून चाललेले, हवाहवाई सरकारः सचिन सावंत

adminbyadmin
in मुंबई
0
हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

मुंबई :- राज्यात हवेवर आलेले, हवेतून चाललेले, हवाहवाई सरकार असून या सरकारला जमिनीवरच्या कटू वास्तवाची जाणिव नाही अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हवाई प्रवासाकरिता प्रतिवर्षी सहा कोटीं रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च झाल्याचे माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. यासदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती प्रचंड खालावलेली आहे, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. कर्जमाफीची प्रक्रिया एके ठिकाणी थांबवली जाते, बोंडअळी व नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतक-यांना सरकारने जाहीर केलेली मदतही मिळत नाही. तुरीच्या खरेदीसाठी कर्ज काढावे लागते. दुसरीकडे पेट्रोल, डिझेलवर लावलेला दुष्काळाचा अधिभार दुष्काळ संपून दोन वर्ष झाली तरी वसुल करणे सुरुच आहे. हायवेवरील दारूची दुकाने बंद झाल्यामुळे इंधनावर लावलेला अधिभार दुकाने  पुन्हा सुरु झाली तरी वसुल केला जात आहे. सातवा वेतन आयोग अद्याप जाहीर केला जात नाही. अशी परिस्थिती असतानाही स्वतः मुख्यमंत्र्यांकडून अशी उधळपट्टी होत असेल तर ते दुर्देवाचे आहे. या अगोदरही मंत्रालयातल्या चहा पानावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार संवेदनशील नसून बेजबाबदार आहे हे स्पष्ट झाले आहे.

करोडों रुपयांचा हवाई प्रवास करून राज्याला गतिमान प्रशासन मिळेल अशी किमान अपेक्षा होती. परंतु याउलट मुख्यमंत्र्यांच्या हवेतील प्रवासामुळे त्यांना जमिनीवरची वास्तविकता आणि महाराष्ट्राची दिवसेंदिवस दुर्धर होत चाललेली परिस्थिती दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या परिक्षांच्या निकालाचा घोळ, विद्यापीठांची दुरावस्था, प्रत्येक विभाग आणि मंत्र्यांचा भ्रष्टाचार, कर्जमाफी प्रक्रियेचा उडालेला बोजवारा यातून या सरकारचा सुमार कारभार दिसून येत आहे. राज्यात 13 हजारांहून अधिक झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी, विविध क्षेत्रात महाराष्ट्राची होत असलेली पीछेहाट व कायदा सुव्यवस्थेची उडालेली धुळधाण याकरिता या सरकारची बेफिकिर वृत्तीच जबाबदार आहे. अतिरंजीत आकडे, मोठमोठे इव्हेंट व जाहिरातबाजीवरील कोट्यवधींची उधळपट्टी याने जनतेची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न जरी असला तरी आगामी निवडणुकांमध्ये जनताच या हवाहवाई सरकारला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही असा टोला सावंत यांनी लगावला. 

Previous Post

ऐरोलीचे पालिका रुग्णालय लवकरच पूर्ण क्षमतेने नागरिकांच्या सेवेत रुजू होणार

Next Post

परिवहन विभागाच्या तक्रारींकडेनगर विकास विभागाच्या निर्देशानंतरही महापालिकेचा कानाडोळाच?

Next Post
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एनएमएमटी बसेसचे मोफत पास देण्याची युवा सेनेची मागणी

परिवहन विभागाच्या तक्रारींकडेनगर विकास विभागाच्या निर्देशानंतरही महापालिकेचा कानाडोळाच?

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणूकीत राष्ट्रवादीचे युवा नगरसेवक मुनवर पटेल विजयी

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडणूकीत राष्ट्रवादीचे युवा नगरसेवक मुनवर पटेल विजयी

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? : खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com