• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 11, 2018

वसंत डावखरे याना भावपूर्ण आदरांजली अर्पण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
वसंत डावखरे याना भावपूर्ण आदरांजली अर्पण

ठाणे  : ठाण्याला मोठे करण्याचे काम कै. आनंद दिघे यांच्यासह वसंत डावखरे यानी केले. डावखरे हे ठाण्याचे वैभव होते. त्यांच्या नावाशिवाय ठाण्याचे नाव पूर्ण होऊ शकत नाही,  अशा शब्दांत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वसंतराव डावखरे यांना आदरांजली अर्पण केली.  

ठाण्याच्या टीपटॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते.  यावेळी  पालकमंत्री  एकनाथ शिंदे, माजी मंत्री गणेश नाईक, आ. जितेंद्र आव्हाड,  काँग्रेसचे शहराध्यक्ष  मनोज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, माजी सनदी अधिकारी   नंदकुमार जंत्रे, इक्बालसिंह चहल,  माजी खा. संजीव नाईक, खा. श्रीकांत शिंदे, सभागृह नेते  नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेते  मिलिंद पाटील, भाजपचे शहराध्यक्ष  संदीप लेले,  आ. रवींद्र फाटक, सुभाष भोईर, माजी मंत्री गणेश नाईक, खा.कपिल पाटील, कृपाशंकर सिंग, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, अनंत तरे,  जेष्ठ पत्रकार प्रकाश जोशी, सोपान बोंगाणे आदी उपस्थित होते. 
माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक  यांनी, हा आघात आपल्या सगळ्यांवर झाला आहे, विरोधी पक्षातील विरोधकांना त्यानी  कधीच शत्रू समजले नाही. नाट्य, सिने, कवी लेखक, पत्रकार, राजकीय सर्वच क्षेत्रात ऋणानुबंध, सर्व समाजासोबतच कुटुंबाला संस्कार दिले, अशा शब्दांत आदरांजली अर्पण केली.
शेकापचे नेते जयंत पाटील  म्हणाले की,  ग्रामीण भागातून आलेली व्यक्ती ठाण्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात आली. आणि त्या व्यक्तीने सबंध महाराष्ट्राला आपलेसे केले. विधान परिषदेच्या सभागृहात त्यांच्यामुळे चैतन्य पसरलेले असायचे. त्यांनी
सभागृहात घेतलेले निर्णय जनतेसाठी  हितकारी ठरले आहेत.  बाळासाहेब देसाईंच्या सान्निध्यात ते वाढले होते. त्यामुळेच त्यांचे चेंबर सर्व राजकीय पुढाऱ्यांचा अड्डा असायचा. आता त्यांची कमतरता पदोपदी जाणवेल. 
आनंद परांजपे म्हणाले की, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काम करून देणारा नेता म्हणून डावखरे यांची राज्याला ओळख आहे.  ठाण्याची सांस्कृतिक ओळख त्यांनी आपल्या महापौर पदाच्या कारकिर्दीत दिली.  राजकारणापालिकडे मैत्री जपण्याचा गुण फक्त वसंतराव डावखरे यांच्यातच होता.  
नंदकुमार जंत्रे  म्हणाले, 1982 मध्ये आमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर  दाट मैत्रीत कधी झाले ते कळले नाही. ३५ वर्षे मैत्री टिकून राहिली.  गल्ली पासून दिल्लीपर्यंत काम करून घेण्याची डावखरे यांच्यात हातोटी होती.
यावेळी संदीप लेले, मनोज शिंदे, चहा, कृपाशंकर सिंह, खा. कपिल पाटील यांनीही आदरांजली अर्पण केली.

Previous Post

नेरूळ मधील आर.टी.ओ. कार्यालयाचा तिढा सुटणार

Next Post

ठाण्यात मिसळ महोत्सवाचे भव्य आयोजन

Next Post
ठाण्यात मिसळ महोत्सवाचे भव्य आयोजन

ठाण्यात मिसळ महोत्सवाचे भव्य आयोजन

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावीः सचिन सावंत

सिडकोच्या चुकीमुळे व पालिकेच्या उदासिनतेमुळे ओमकारचे रहीवाशी भोगतात गेली २० वर्षे दुर्गंधींच्या नरक यातना

सिडकोच्या चुकीमुळे व पालिकेच्या उदासिनतेमुळे ओमकारचे रहीवाशी भोगतात गेली २० वर्षे दुर्गंधींच्या नरक यातना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com