• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 14, 2018

सिडकोच्या चुकीमुळे व पालिकेच्या उदासिनतेमुळे ओमकारचे रहीवाशी भोगतात गेली २० वर्षे दुर्गंधींच्या नरक यातना

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सिडकोच्या चुकीमुळे व पालिकेच्या उदासिनतेमुळे ओमकारचे रहीवाशी भोगतात गेली २० वर्षे दुर्गंधींच्या नरक यातना

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे समुद्रसपाटीपासून ३ मीटर खोलवर आहे. परंतु नवी मुंबई शहराचा विकास करणार्‍या सिडकोने जुईनगर परिसरात इमारतींची निर्मिती करताना खोलगट भागाची निवड केल्याने ४०० हून अधिक रहीवाशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. जुईनगर सेक्टर २४ मधील आमेकार सोसायटीतील रहीवाशांनी मल:निस्सारणचा त्रास व पावसाळ्यात साचणार्‍या पाण्याचा त्रास याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही आजवर उदासिनताच दाखविल्यामुळे येथील रहीवाशांचा मृत्यू झाल्यावरच पालिका प्रशासन उपाययोजना करणार काय, असा संतप्त प्रश्‍न स्थानिक रहीवाशांकडून विचारण्यात येत आहे.
जुईनगर सेक्टर २४ येथे रेल्वे फाटकाजवळ सिडकोची ओमकार सोसायटी आहे. या सोसायटीत ८० सदनिका असून ४०० पेक्षा अधिक रहीवाशी वास्तव्य करत आहेत. या सेासायटीतील इमारतीचे बांधकाम सिडकोने चुकीच्या ठिकाणी केल्यामुळे गेली १८ वर्षे रहीवाशांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. रस्त्यापासून व सपाटीपासून खोलगट भागात सिडकोने या इमारती बांधल्यामुळे सोसायटीतील मल:निस्सारण वाहिनी सदैव तुंबलेली असते. हे सांडपाणी सतत सोसायटी आवारात असते. पावसाळ्यात सभोवतालचे सर्व पाणी सोसायटीत येवून तलाव निमार्र्ण होतो. मल:निस्सारन वाहिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्याने सोसायटीतील रहीवाशांना जीव मुठीत घेवून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याविषयी लोकप्रतिनिधी, पालिका प्रशासन सर्वत्र पाठपुरावा करूनही सर्व स्तरावर उपेक्षा झाल्याचा संताप रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अखेरिला संतप्त रहीवाशांनी आता प्रशासनाच्या विरोधात सत्याग्रह करण्याचा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
येथील सदनिकाधारकांनी आपली समस्या सर्वपक्षीय राजकारण्यांच्या तसेच पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. निवडणूका जवळ आल्यावर मतदान मागण्यासाठी सोसायटीत येणारे राजकारणी नंतर समस्या विचारण्यासाठी फिरकतही नसल्याचा संताप येथील रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे. गेली २० वर्षे सिडकोच्या चुकीचा आणि पालिकेच्या उदासिनतेचा फटका सहन करत येथील रहीवाशी आणि त्यांचा परिवार नरक यातना भोगत आहे. पावसाळ्यात तर सभोवतालचे पाणी या सोसायटी आवारात जमा होवून येथे तलाव तयार होतो. बाराही महिने सांडपाण्याची डबकी असल्यामुळे रहीवाशांना साथीच्या आजाराचाही सामना करावा लागत आहे.

Previous Post

नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावीः सचिन सावंत

Next Post

महापालिकेच्या आधार कार्ड केंद्रावरील सावळागोंधळ कायम

Next Post
महापालिकेच्या आधार कार्ड केंद्रावरील सावळागोंधळ कायम

महापालिकेच्या आधार कार्ड केंद्रावरील सावळागोंधळ कायम

काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

मुंबईच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घेतल्याबद्दल काँग्रेस पक्षाकडून नौदलाचे अभिनंदन

घणसोलीतील सेंट्रल पार्क आणि ऐरोलीच्या नाटयगृहाचे काम लवकर पूर्ण करा

आमदार संदीप नाईक मंगळवारी साधणार मतदारांशी सुसंवाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com