• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 31, 2017

सरकारला लोकांच्या जीविताबाबत संवेदना राहिली नाहीः खा. अशोक चव्हाण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा कालबध्द कार्यक्रम हाती घ्या.

 मुंबई : महानगरपालिका, म्हाडा अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमतामुळे आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे मुंबई आणि परिसरात इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. यामध्ये किड्या-मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण सरकारला लोकांच्या जीविताबाबत संवेदना राहिली नाही त्यामुळे धोकादायक इमारतीबाबत सहकार काहीच ठोस निर्णय घेत नाही. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

भायखळा भेंडीबाजार येथील हुसैनीवाला ही पाच मजली इमारत आज सकाळी कोसळली या दुर्घटनेत 21  जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेला मुंबई महापालिका आणि म्हाडा जबाबदार आहे. महापालिका व म्हाडा अधिकारी यांच्या भ्रष्ट संगनमुळे वारंवार अशा दुर्घटना घडत आहेत. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस म्हाडा ने दिली होती तरी इमारत खाली का केली नाही ? एक महिन्यापूर्वी घाटकोपर येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. मुंबईत झालेल्या पावसात गेल्या तीन दिवसांत 10 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. आणि आजच्या दुर्घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वारंवार घडणा-या घटना़ंमधून सरकार काहीच बोध घेत नाही. या सर्व घटनांसाठी जबाबदार असणा-या अधिका-यांवर कठोर कारवाई करावी असे खा. चव्हाण म्हणाले. 

सरकार आणि महापालिकेचे डिजास्टर मॅनेजमेंट कुठे आहे? फक्त कागदावरच प्रत्यक्षात काहीच नाही. बुलेट ट्रेन, समृध्दी महामार्गापेक्षा लोकांचा जीव वाचविणे महत्त्वाचा आहे. सरकारने त्याकडे लक्ष द्यावे. शासनाने तात्काळ धोकादायक इमारती खाली कराव्यात आणि या इमारतींच्या पुनर्बांधणीचा कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना तात्काळ मदत द्यावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Previous Post

आणि कैलाश पर्वतावर डमरु वाजू लागला !

Next Post

भेंडी बाजारच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई मनपा जबाबदार!: विखे पाटील

Next Post
लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

भेंडी बाजारच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई मनपा जबाबदार!: विखे पाटील

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

वर्षानुवर्षे काम करतोय, पण आमचा पीएफ क्रमांक कोणी सांगेल काय?

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

पदवीच्या निकालापर्यत महापालिकेने शिष्यवृत्ती धोरण शिथील करण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com