• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 13, 2017

दुबार पेरणीसाठी सरकारने सज्ज रहावे!: राधाकृष्ण विखे पाटील

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
शहरातील मुलाला गावाकडच्या बापाची किंमत राहिली नाही…

शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे व पतपुरवठा करण्याची मागणी

मुंबई : पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची भीती निर्माण झाली असून, सरकारने दुबार पेरणीकरिता शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे व पतपुरवठ्यासंदर्भात मदत करण्याची तयारी सुरू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

राज्यातील पेरणीच्या परिस्थितीसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, राज्याच्या कृषिमंत्र्यांनीही 2 दिवसात पाऊस न आल्यास 12 जिल्ह्यात दुबार पेरणीची वेळ ओढवू शकते, यास पुष्टी दिली आहे. परंतु, सरकारने पाऊस येतो की नाही, याची प्रतीक्षा करण्याऐवजी दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असे गृहित धरून तातडीने पूर्वतयारी सुरू करण्याची गरज आहे.

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या थेट बांधावर खते पोहोचवली होती. कृषि विभागाच्या कार्यालयांमधून मोफत बियाण्यांची व्यवस्था केली होती. त्यानुसार विद्यमान सरकारनेही शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याच्या अनुषंगाने खते व बियाणे पुरवठ्याची तयारी तातडीने सुरू करावी, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

पीक कर्ज वितरणासंदर्भात तूर्तास मिळणारी माहिती समाधानकारक नाही. जुलैच्या मध्यापर्यंत अनेक बॅंकांनी कर्ज वितरणाचे जेमतेम 50 टक्के उद्दिष्ट गाठल्याची माहिती प्रसार माध्यमांकडून येते आहे. याचाच अर्थ अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना पेरणीच्या तयारीसाठी भांडवल उपलब्ध झालेले नाही, हे स्पष्ट आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करताना सरकारने पेरणीसाठी 10 हजार रूपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु, या योजनेंतर्गत जेमतेम 1 कोटी रूपयांचे वितरण झाल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने गाफील न राहता मोफत खते व बियाण्यांसोबतच शेतकऱ्यांना पतपुरवठा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने तातडीने पावले उचलावीत, अशीही मागणी विरोधी पक्षऩेत्यांनी केली आहे.

Previous Post

अग्निशमन सेवा सप्ताहातील निबंध लेखन व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार

Next Post

पर्यावरणप्रेमींना खुणावतोय पनवेलच्या सर्वाधिक जवळचा ”आदई धबधबा”

Next Post
पर्यावरणप्रेमींना खुणावतोय पनवेलच्या  सर्वाधिक जवळचा ”आदई धबधबा”

पर्यावरणप्रेमींना खुणावतोय पनवेलच्या सर्वाधिक जवळचा ''आदई धबधबा''

सिराजेम तंत्रज्ञानाचे पनवेलकरांना आकर्षण

सिराजेम तंत्रज्ञानाचे पनवेलकरांना आकर्षण

महापालिकेच्या सभेत विषय चर्चेला ठेवणार : महापौर डॉ. कविता चौतमल यांची ग्वाही

महापालिकेच्या सभेत विषय चर्चेला ठेवणार : महापौर डॉ. कविता चौतमल यांची ग्वाही

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com