• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 14, 2017

महापालिकेच्या सभेत विषय चर्चेला ठेवणार : महापौर डॉ. कविता चौतमल यांची ग्वाही

adminbyadmin
in पनवेल
0
महापालिकेच्या सभेत विषय चर्चेला ठेवणार : महापौर डॉ. कविता चौतमल यांची ग्वाही
पनवेल : दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांना राज्य शासनाने ‘मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ द्यावा, याकरीता येणार्‍या सभेत ठराव घेवून राज्य शासनाला  शिफारस  करण्याची  संघर्ष समितीची विनंती चर्चेला घेवू, अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर डॉ. कविता चौतमल यांनी दिली.
आज, शुक्रवारी  (दि. 14) सकाळी महापौर डॉ. कविता चौतमल यांची महापालिकेत संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी संवाद साधला.
पनवेल नगरीने दिबांना घडवले आहे. याच नगरीचे ते नगराध्यक्ष होते. आमदार, खासदार होते. त्यांना राज्य शासनाचा मानाचा, मरणोत्तर का होईना, परंतू, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा यासाठी संघर्ष समितीने राज्य शासनाला साकडे घातले आहे. पनवेल, उरण तालुक्यातील ग्रामपंचायती, जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री महोदयांना पत्र पाठवून त्यांच्याकडून राज्य शासनाला शिफारस पत्र मागण्यात आले असल्याची माहिती डॉ. चौतमल यांना देण्यात आली. 
महापालिकेने यासंदर्भात निर्णय घेवून शिफारस पत्र द्यावे, दिबांच्या नावाने सामाजिक स्तरावर काम करणार्‍या व्यक्तीला पुरस्कार द्यावा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती घोषित करावी, महापालिका क्षेत्रात दिबांचा पुतळा उभारण्यात यावा आदी महत्वपूर्ण मागण्यांसह विशेष अधिकार वापरून महापौरांनी सभा बोलावून विशेष समिती सभापती, प्रभाग समिती रचना, अध्यक्ष निवड आणि त्या प्रभाग समितीवर एनजीओची नियुक्ती करताना सामाजिक, वैद्यकीय, क्रीडा, न्याय प्रक्रिया क्षेत्रातील मान्यवरांची, थोडक्यात बिगर राजकीय व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. या सर्व मागण्यांची महापौर डॉ. चौतमल यांनी दखल घेतली.
या चर्चेत नगरसेवक तथा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, विजय काळे, माधुरी गोसावी, कांतीलाल कडू आदींनी सहभाग घेतला.
शिष्टमंडळात दमयंती म्हात्रे, उज्वल पाटील, पराग बालड, कविता ठाकूर, भारती जळगावकर, मंगल भारवाड, रमेश फुलोरे आदींचा समावेश होता
Previous Post

सिराजेम तंत्रज्ञानाचे पनवेलकरांना आकर्षण

Next Post

छोट्या छोट्या संधी आयुष्यात सुवर्णकाळाकडे घेऊन जातात, अनुभवाने मोठे व्हा !

Next Post
छोट्या छोट्या संधी आयुष्यात सुवर्णकाळाकडे घेऊन जातात, अनुभवाने मोठे व्हा !

छोट्या छोट्या संधी आयुष्यात सुवर्णकाळाकडे घेऊन जातात, अनुभवाने मोठे व्हा !

अशोक गावडेंच्या परिश्रमातून साकारलेली व नावारूपाला आलेली भाजी व्यापार्‍यांची श्रीगणेश सोसायटी

मुंबईप्रमाणे एमएमआरडीए क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांचे देखील ओसी शिवाय डिम्ड कन्वेयन्स करावे- आमदार निरंजन डावखरे

ठाणे नवी मुंबई व मिरा भाईंदर शहराच्या विकास काम संदर्भात खासदार राजन विचारे आग्रही

ठाणे नवी मुंबई व मिरा भाईंदर शहराच्या विकास काम संदर्भात खासदार राजन विचारे आग्रही

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com