• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2016

सरकारकडून मृतांच्या नातलगाची क्रुर थट्टा; भरपाई म्हणून विम्याची रक्कम

adminbyadmin
in मुंबई
0
महाडला पुल कोसळला,दोन एसटी बेपत्ता
 

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रवासी विमा योजनेची घोषणा केली होती. या विम्यासाठी  एसटी महामंडळाकडून प्रत्येक प्रवाशाकडून प्रत्येकी एका तिकिटावर एक रूपया अधिभार घेतला जात आहे. एसटी महामंडळाच्या बसने राज्यभरात अणि राज्याच्या बाहेर दररोज ५५ ते ६० लाख प्रवासी प्रवास करतात. सुट्यांच्या काळात हाच आकडा ७० लाखाच्या आसपास पोहोचतो. 

या एक रुपया अधिभारातून महामंडळाला वार्षिक १७० कोटी रुपये मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अपघातातील जखमी अणि मृतांच्या वारसाना मदत म्हणून यातील १०२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. याच रकमेतुन महाडच्या अपघातग्रस्तांच्या वारसाना मदत दिली जाणार आहे. त्यामुळे महामंडळाकडून वेगळी कोणतीही मदत दिली जाणार नसून केवळ विम्यापोटी घेतलेल्या एक रूपया अधिभारच उलटपक्षी प्रवशांना मिळत आहे.  

अधिभाराबाबत  परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ईनाडूशी बोलताना स्पष्ट केले की, विमा योजनेच्या घोषणे नुसार ही मदत दिली जात आहे. कोणत्याही विमा कंपनीकडून नाही तर महामंडळाच्या तिजोरीतुन ही मदत दिली जाणार आहे. त्यामुळे स्पष्ट झाले आहे की, एसटी महामंडळ अपघातातील मृतांच्या वारसांना कोणतीही वेगळी रक्कम देण्यात येणार नाही. अधिभारातून मिळालेली ही रक्कम असणार आहे.

एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाल्यास प्रवाशांना यापूर्वी केवळ दोन लाख रुपयांची भरपाई मिळत होती. ही रक्कम वाढवण्याच्या दृष्टीने महामंडळाने शक्कल लढवत प्रत्येक तिकीटा मागे एक रुपया अधिकार घेण्यास सुरुवात केली. त्या अधिभारातून कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात असलेल्या महामंडळाच्या तिजोरित ही भर पडणार आहे.

यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की,एक रूपया अधिभार जर प्रत्येक प्रवाश्यानकडून घेतला जात आहे, तर त्यांना अपघातात विम्याची रक्कम मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यांना विम्याची रक्कम वेगळी अणि महामंडळाकडून वेगळी भरपाई मिळाली पाहिजे. परिवहन मंत्री विम्याची रक्कमें ला महामंडळाची मदत म्हणू शकत नाही. परिवहन मंत्र्यांची ही चालबाजी आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संजय धर्माधिकारी म्हणाले, की महाड पूल वाहून एसटी अपघातात मृत्यू झालेल्यांना मदत वेगळी मिळाली पाहिजे आणि विमा रक्कम वेगळी मिळाली पाहिजे असे ते बोलले आहेत. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे याबाबत म्हणाले की, सरकार आणि राज्य परिवहन महामंडळाकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत मिळाली पाहिजे. सरकारने याबाबत फसवाफसवी करु नये. आपण मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्याशी बोलून मागणी करणार आहे. 

Previous Post

वाशी व घणसोली विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेत 40 हजारांची दंड वसूली

Next Post

शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा

Next Post
शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा

शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षकांचा इशारा

कुकशेतमध्ये नागपंचमीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदियाळी

कुकशेतमध्ये नागपंचमीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदियाळी

उद्यापासून अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

उद्यापासून अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com