• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 12, 2016

मंत्री सदाभाऊ खोत यांनी दादर मार्केटमध्ये विकली भाजी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मंत्री सदाभाऊ खोत यांनी दादर मार्केटमध्ये विकली भाजी

अनंतकुमार गवई

विविध मार्केटमध्ये शेतकऱ्यांशी चर्चा

मुंबई :  शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा संप सुरू असतानाच महाराष्ट्राचे कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने उभे असलेले दिसत आहेत. मंगळवारी पहाटे सदाभाऊ खोत यांनी दादरच्या प्लाझा भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन स्वत: भाजी विकली. 

यावेळी स्वत: सदाभाऊ खोत हे रस्त्यावर उतरुन मार्केटची पाहणी करत होते. नुकतंच सदाभाऊ खोत यांनी कृषी आणि पणन राज्यमंत्रीपदाचा भार स्वीकारला आहे. त्यानंतर लगेचच सदाभाऊ कामाला लागले आहेत.  सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी पहाटेच दादर मार्केटमध्ये हजेरी लावली.

व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद ठेवल्याने आता शेतमाल विकण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरलं आहे. मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्रीला उतरवला. दादरच्या मार्केटमध्ये ३०० गाड्यांची आवक झाली.

पहाटे पाच वाजता मार्केटमध्ये आलेल्या खोत यांनी जुन्नरवरून १० टेम्पो घेऊन आलेल्या श्रीराम गाढवे या शेतकऱ्याला भाजीपाल विकण्यासाठी स्वत: मदत केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मंत्र्याने दादर भाजीपाला मार्केटमध्ये जावुन शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी भाजी विकल्याची घटना घडली असून या कृतीद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना सरकार सदैव तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीच दिली. 

ना. सदाभाऊ खोत स्वत: विविध बाजारात भाजी मंडईत गेले व तेथे आलेल्या हिंदुराव शिळीमकर, राजेंद्र पवळे, रिंगे बुवा अशा महाराष्ट्राच्या विविध भागातुन आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची चौकशी केली. तसेच येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास आपण सहकार्य करू व संरक्षणही देऊ, असे आश्वासनही खोत यांनी दिले.

 

  • शेतकऱ्याला पुन्हा अडचणीत आणू नका

“व्यापाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्यांच्यासाठी सरकारकडून चर्चेची दारे खुली आहेत. तीन-चार वर्षांपासून शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पुन्हा एकदा शेतकऱ्याला अडचणीत आणू नका. शेतकऱ्याची सद्य:स्थिती पाहून, पणन विभागाने शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांना विकता यावा अशी यंत्रणा उभी केली. महापालिकेच्या भाजी मंडईत आज भाजीपाला पोहोचला. उद्यापासून पुन्हा गाड्या वाढवू”, असेपणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.

  • शेतकरी पिकवायला आणि विकायलाही शिकतोय

पूर्वी माझा शेतकरी पिकवायला शिकला होता, मात्र विकायला शिकला नव्हता. आता स्थिती बदलत आहे, शेतकरी पिकवायला आणि विकायलाही शिकतोय याचा आनंद आहे. सरकार तुमच्या बाजूचे आहे, तुम्ही चिंता करु नका. हा दिलासा मी शेतकऱ्याला देतो, असे आश्वासन सदाभाऊंनी दिले.

  • तोडगा न निघाल्यास कडक पावलं उचलू

बाजार समित्यांबाबत बुधवारी बैठक बोलावण्यात आली आहे. बुधवारी तोडगा निघेल अशी आशा आहे. चर्चेने प्रश्न सोडवू, पण तोडगा निघालाच नाही, तर सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही, कडक पावलं उचलू. व्यापाऱ्यांना शेतकरी आणि ग्राहकांना कोंडीत पकडून देणार नाही, असं सदाभाऊंनी ठणकावले.

Previous Post

मार्केट बंदबरोबर फेरीवालेही गायब

Next Post

विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर आणखी एक संधी ? अकरावी ऑनलाईन प्रवेश

Next Post
सीबीएसई बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर, एकूण ९६.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

विद्यार्थ्यांना २० जुलैनंतर आणखी एक संधी ? अकरावी ऑनलाईन प्रवेश

ममता कु लकर्णीची मुंबई-ठाण्यासह गुजरातमध्ये बँक खाती

ममताला दोन वर्षापूर्वी केनियात भेटले

मार्केट बंदबरोबर फेरीवालेही गायब

एपीएमसीमध्ये १३०० टन भाजीमाल दाखल!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com