• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 10, 2016

कांदा, बटाटा, फळ, भाजीपाला मार्केट १२ जुलैपासून बेमुदत बंद

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कांदा, बटाटा, फळ, भाजीपाला मार्केट १२ जुलैपासून बेमुदत बंद

नवी मुंबईः मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मधील फळे आणि भाजीपाला यावरील नियमन सरसकट उठविण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारने व्यापार्‍यांची मागणी मान्य न करता एपीएमसी मार्केटमधील व्यापारावर नियमन कायम ठेवल्यामुळे नवी मुंबईतील कांदा – बटाटा, फळ आणि भाजीपाला मार्केटमधील व्यापारी येत्या १२ जुलै २०१६ पासून बेमुदत बंद पाळणार आहेत. या आंदोलनामध्ये राज्यातील विविध बाजार समित्या उद्या ११ जुलै पासूनच सहभागी होणार आहेत. शेतमालावरील नियंत्रण हटविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सर्व प्रथम व्यापार्‍यांनी आणि माथाडी कामगारांनी कडाडून विरोध केला होता. मात्र, नंतर या निर्णयाचे व्यापार्‍यांनी स्वागत केले.
शेतमालावरील नियंत्रण हटविताना गुजरात राज्याच्या धर्तीवर सरसकट हटवा, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली होती. मात्र, राज्य सरकारने फक्त एपीएमसी बाहेरील व्यापारावरील नियंत्रण हटवून एपीएमसीमध्ये व्यापार करणार्‍या व्यापार्‍यांवर नियंत्रण कायम ठेवले. अडत पूर्वी शेतकर्‍यांच्या पट्टीतून कापली जात होती. आता नवीन नियमानुसार अडत ग्राहकांकडून घ्यावी लागणार आहे. तोलई आणि लेव्ही सुद्धा ग्राहकांच्या माथी मारण्यात येणार आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये शेतमाल खरेदी करण्यासाठी ग्राहकच येणार नाहीत. ग्राहक रस्त्यावर माल घेणे पसंत करणार आहेत. परिणामी एपीएमसी मधील कांदा-बटाटा, फळ आणि भाजीपाला मार्केटमधील व्यापारी येत्या १२ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. पुणे, कोल्हापूर आणि नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यापारी या बेमुदत संपात उद्या ११ जुलै पासून सहभागी होणार आहेत. जर एपीएमसी मधील व्यापार्‍यांचा संप चिघळला तर ऐन पावसाळ्यात स्वयंपाक घरात भाजीपाल्याचा दुष्काळ पडणार आहे.

Previous Post

जूहू बीचवर आंघोळ करणं तरुणीला पडलं महाग

Next Post

पनवेल महापालिकेसंदर्भात १६ जुलैला सुनावणी

Next Post
पनवेल महापालिकेसंदर्भात १६ जुलैला सुनावणी

पनवेल महापालिकेसंदर्भात १६ जुलैला सुनावणी

मुंबई उपनगरी रेल्वेच्या १३१ कर्मचाऱ्यांचा रेल्वे रूळाने घेतला बळी

लोकलची कपलिंग तुटली, मध्यरेल्वे विस्कळीत

नवी मुंबई शहर ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्णत: हागणदारी मुक्त

नवी मुंबई शहर ऑक्टोबर २०१६ पर्यंत पूर्णत: हागणदारी मुक्त

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com