• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 13, 2016

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लीन चीट

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लीन चीट

 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) क्लीनचीट दिली असून, यामुळे त्यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएकडून आज (शुक्रवारी) आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे नाव नाही. त्यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध सबळ पुरावे सापडले नसल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटलं आहे.

या प्रकरणात एकूण 10 जणांवर आरोपपत्र सादर करण्यात आलं आहे. त्यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य सर्व आरोपींवरील मोक्काही एनआयएकडून काढून टाकण्यात आला आहे. बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडविधान संहितेतील इतर कलमांच्या आधारे आरोप ठेवण्यात आलं आहेत.

महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख आणि 26/11 हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांनी या प्रकरणी केलेल्या तपासानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य काही आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते. पण एनआयएने 10 जणांविरोधात आरोपपत्र देऊन उर्वरित आरोपींना सबळ पुराव्यांभावी क्लीन चीट दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांना क्लिन चिट मिळाल्याचा आम्हाला आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. हा खटला चुकीचा होता. खोट्या आरोपांखाली आरोपींना अटक करण्यात आली होती. आठ वर्षे साध्वी आणि कर्नल पुरोहीतसारख्या लोकांना अंडा सेलमध्ये सडवण्यात आले असून आता ज्या अधिकार्‍यांनी आणि राजकारण्यांनी हे खोटे खटले दाखल केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Previous Post

प्रेमविवाह केल्याने जोडप्यावर कुऱ्हाडीने हल्ला

Next Post

मुंबई महापालिका बांधणार परवडणारी १० लाख घरे

Next Post
मुंबई महापालिका बांधणार परवडणारी १० लाख घरे

मुंबई महापालिका बांधणार परवडणारी १० लाख घरे

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प.रे. पुन्हा विस्कळीत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com