• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 1, 2016

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आग

adminbyadmin
in ठाणे
0
कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आग

ठाणे : मुंबईच्या देवनार येथील डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याने निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्‍वभूमीवर आता कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कल्याणमध्ये गेल्या वर्षभरापासून अशाप्रकारे आग लागत असून निर्माण होणार्‍या धुरामुळे नागरिक त्रस्त आहेत. याप्रकरणी गेली अनेक महिन्यापासून कारवाईची मागणी केली जात असली तरी प्रशासन यातून नागरिकांची सुटका कशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबई येथील देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर शनिवारी सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने संपूर्ण परिसर जणू गिळंकृत केला होता. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची एकच धावपळ उडाली असून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत वादग्रस्त ठरलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरही गेल्या अनेक महिन्यांपासून आग लागत आहे. या आगीमुळे निर्माण होणार्‍या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हा धूर संपूर्ण परिसरात पसरत असल्याने या परिसरात नागरिकांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. याबाबत अनेकदा आंदोलने, पत्रव्यवहार करूनही पाण्याचे बंब पाठवून तात्पुरती कारवाई करण्यात येते. मात्र, वारंवार घडणार्‍या आग लागण्याच्या घटनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाबत सुरुवातीला प्रशासनाकडून मिथेल वायुमुळे आग लागत असावी असा तर्क लावण्यात येत होता. तसेच आग लावून नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍या इसामांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी महापालिकेने बाजारपेठ पोलिसांकडे केली होती. मात्र, त्यानंतरही आग लागण्याच्या घटना घडत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत कर्तव्यदक्ष पालिका प्रशासनाने कारवाई करत आमची सुटका करावी, अशी मागणी धुराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी केली आहे.

Previous Post

धावत्या एक्सप्रेमध्ये गुटखा विक्रेत्याची दहशत

Next Post

कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Next Post

कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

‘स्मार्ट सिटी’चा भुर्दंड जनतेलाच!

‘स्मार्ट सिटी’चा भुर्दंड जनतेलाच!

भावकीच्या वादातून तरूणावर हल्ला

भावकीच्या वादातून तरूणावर हल्ला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com