• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 14, 2015

कोल्हापुरच्या भगिनींना फाशीची प्रतिक्षा

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
कोल्हापुरच्या भगिनींना फाशीची प्रतिक्षा

कोल्हापूर : कोल्हापुरातील ४२ मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या करणार्‍या रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, १८ डिसेंबर २०१४ रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची रेणुका आणि सीमा या बहिणींचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्याला आता एक वर्ष पूर्ण होत आहे.
मृत्यूदंडाची शिक्षा ही जन्मठेपेत बदलावी, यासाठी या भगिनींची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने ही याचिका फेटाळली तर लवकरच या दोन बहिणींना फाशी होईल. देश स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत एकाही महिला गुन्हेगाराला मृत्यूदंड दिला गेला नाही. त्यामुळे यांना जर मृत्यूदंड दिला तर हा देशातील महिला आरोपींचा पहिला मृत्यदंड ठरणार आहे.
सैतानालाही लाजवेल अशा या क्रुर हत्याकांडाची मुख्य सूत्रधार रेणुका आणि सीमा यांची आई अंजनाबाई गावित ही होती. स्वतः आई असलेली ही स्त्री आणि तिच्या दोन मुलीच्या मदतीने इतरांच्या बालकांना पळवून नेत होत्या. त्यानंतर दमदाटी करून किंवा निरागस मुलांकडून भीक मागून घेतले जात होते. एखद्या मुलाने जर या बाबत कुणाला काही सांगितले तर त्याला ठार मारले जात होते. अशा प्रकारे त्यांनी ४२ मुलांना ठार केल्याचा आरोप होता. पोलिसांकडे त्याची त्यांनी कबुलीही दिली. पण, ४२ पैकी ९ हत्या झाल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. २९ ऑक्टोबर १९९६ रोजी हे बालहत्याकांड उघडकीस आले. यामुळे सारा महाराष्ट्र हादरला होता. सुरवातीला अंजनाबाई एकटीच मुलांना पळवीत असे. नंतर तिने दोन्ही मुलींना त्यात सामील करून घेतले. १९९० च्या सुमारास त्यांनी मुलांना पळवण्यास सुरुवात केली. चोरी, पाकीटमारी करण्यासाठी एक ते तेरा वर्षांपर्यंतच्या बालकांना पळवून त्यांचा खून केल्याचे हे प्रकरण आहे. वर्ष १९९७ मध्ये अंजनाबाईचा मृत्यू झाला. त्यामुळे आता रेणुका आणि सीमाच उरल्या आहेत.
* १९९० ते १९९६ या काळात रेणुका, तिचा पती किरण शिंदे, बहीण सीमा आणि आई अंजनाबाई गावित यांनी १३ लहान मुलांचे अपहरण केले होते. त्यातील नऊ मुलांचा निर्घृण खून करण्यात आला होता.
* आई अंजनाबाईचा १९९७ मध्ये मृत्यू झाला. किरण शिंदे हा या खटल्यात माफीचा साक्षीदार झाला होता. दयेचा अर्ज फेटाळल्यामुळे दोन्ही बहिणींच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
* अंजनाबाईचा १७ डिसेंबर १९९७ रोजी कारागृहात मृत्यू झाला, त्यामुळे रेणुका व सीमा यांच्यावर खटला चालविण्यात आला. तेरा बालकांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला.
* २८ जून २००१ रोजी कोल्हापूरमधील सेशन कोर्टाने या दोघींना नऊ मुलांचा खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. रेणुका व सीमाने याला हायकोर्टात आव्हान दिले.
* हायकोर्टाने ८ सप्टेंबर २००४ रोजी सेशन कोर्टाचा फाशीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाला या बहिणींनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
* सुप्रीम कोर्टानेही ३१ ऑगस्ट २००६ रोजी त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
* फाशीची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी केलेला दयेचा अर्ज दाखल, जुलै २०१४ मध्ये राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
** न्यायालयात निर्णयाकडे लक्ष
आपल्या मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेत बदलावी, यसाठी या दोघींनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका न्यायाधीश व्ही. एम कानाडे आणि पी. डी. कोडे यांच्या बेंचने मंजूर केली. त्यावर आता काय निर्णय होते यावर या भगिनींचा मृत्यूदंड ठरणार आहे. या प्रकरणी २४ नोंव्हेबर २०१५ पुढची सुनावणी होणार आहे. कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने २००१ या दोघींना फाशीची शिक्षा ठोठावली होती. सर्वोच्च न्यायालयो वर्ष २००६ मध्ये ती कायम ठेवली. राष्ट्रपतींनीही २०१४ मध्ये त्यांच्या दयेचा अर्ज फेटाळला.

Previous Post

दुचाकी पुलावरून खाली पडून अपघात, एक ठार

Next Post

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

Next Post
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेना-भाजपाची महापालिका मुख्यालयावर धडक

पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेना-भाजपाची महापालिका मुख्यालयावर धडक

काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

महापालिका कार्यक्षेत्रातील जलवाहिन्यांसह नळजोडण्याची तपासणी करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com