• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2015

एअर इंडियाचे वैमानिक संपावर

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
एअर इंडियाचे वैमानिक संपावर

नवी दिल्ली : एअर इंडियामधील कामगारांशी संबंधित कायद्यांमध्ये ढवळाढवळ करणार्‍या केंद्र सरकारच्या प्रस्तावित बदलाला विरोध करण्यासाठी एअर इंडियाच्या वैमानिकांनी व्यवस्थापनासोबत असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम शुक्रवारी विमान सेवेवर झाला.
एअर इंडियाच्या अनेक वैमानिकांनी शुक्रवारी सामूहिक रजा टाकल्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण लांबणीवर पडले आहे.
केंद्र सरकारच्या या प्रस्तावित बदलांनंतर एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या वैमानिकांचा आणि अभियंत्यांचा कामगार हा दर्जा रद्द होणार आहे. कामाच्या ठिकाणी कामगार संघटना स्थापन करण्यास तसेच कामगारांना संपावर जाण्याचा त्यांचा हक्कही संपुष्टात येणार आहे. कामगार कायदा १९४७ अन्वये, ज्या कामगाराचे वेतन १० हजार रुपयांहून अधिक आहे, असे कर्मचारी कामगार नसून ते प्रशासकीय विभागात गणले जातात. त्यामुळे त्यांना कामगारांप्रमाणे संपावर जाता येत नाही. मात्र, वैमानिकांनी याला तीव्र विरोध केला आहे.
दरम्यान, वैमानिकच उपलब्ध नसल्यामुळे दिल्लीहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाचे एआय ११५ या विमानाचे उड्डाण आठ तासांपेक्षा जास्त वेळ रखडले आहे. मुंबई-दिल्ली या दरम्यानची एअर इंडियाची अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे यामुळे अनेक तासांपासून रखडली आहेत. मुंबईतील आठ विमानंसह देशभरातील ११ विमानांचे उड्डाण ऱखडले आहे. अनेक प्रवाशांनी याबद्दल संताप व्यक्त केला.
एअर इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी पदभार स्वीकारण्याआधीच वैमानिकांनी बंड पुकारल्याने त्यांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
याआधी २०१३ मध्ये केंद्रीय कामगार मंत्रालयाने एअर इंडियाच्या वैमानिकांचा आणि अभियंत्यांचा कामगार हा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच वैमानिकांनी आणि अभियंत्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी संपात प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे पाहून अखेर कामगार मंत्रालयाला माघार घ्यावी लागली होती.

Previous Post

पहिली ते आठवीपर्यंत आता सक्तीची परीक्षा

Next Post

साथीच्या आजारांविषयी जनजागृती अभियान राबविण्याची नामदेव भगत यांची मागणी

Next Post
साथीच्या आजारांविषयी जनजागृती अभियान राबविण्याची नामदेव भगत यांची मागणी

साथीच्या आजारांविषयी जनजागृती अभियान राबविण्याची नामदेव भगत यांची मागणी

रोजगार व भाषेवरून मनसेचे एरोलीत आंदोलन

रोजगार व भाषेवरून मनसेचे एरोलीत आंदोलन

बलात्काराच्या विधानाबद्दल मुलायमसिंहांना समन्स

बलात्काराच्या विधानाबद्दल मुलायमसिंहांना समन्स

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com