• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 16, 2015

मोडकळीस कार्यालयातून चालतोय ठाणे जिल्ह्यातील टपाल कारभार

adminbyadmin
in ठाणे
0
मोडकळीस कार्यालयातून चालतोय ठाणे जिल्ह्यातील टपाल कारभार

ठाणे : ठाणे जिल्ह्यात अनेक धोकादायक इमारतीत पोस्ट ऑफिसेस आहेत. ती मोडळीस आलेली आहेत. त्यामुळे या इमारती तात्काळ खाली करा अन्यथा दुर्घटनेस पोस्ट खातेच जबाबदार राहील, अशा सूचना ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मुख्य पोस्ट मास्तर जनरल ए. के. दास यांची भेट घेऊन दिला आहेत.
ठाणे शहराची लोकसंख्या 23 लाखांपर्यंत गेली आहे. 50 वर्षापूर्वी भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारती आता धोकादायक झाल्याने या धोकादायक इमारतीना ठाणे महानगरपालिकेने नोटिसा बजावून खाली करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र, या इमारतीचे मालक व भाडेकरू यांच्या वादामुळे या इमारतीची पुनर्बाधणी झाली नाही. त्यामुळे ठाण्यातील कोपरी येथील टपाल कार्यालयातील 25 कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. तसेच या टपाल कार्यालयात दररोज येणारे सुमारे 200 ते 250 ज्येष्ठ नागरिक व महिन्याच्या अखेरीस येणारे सोळाशे निवृती वेतनधारक जीव धोक्यात घालून पेन्शनसाठी येत असतात. पोस्टाची ही धोकादायक इमारत कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने तत्काळ ते विभागीय पोस्ट ऑफिस दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
तसे न केल्यास इमारत दुर्घटनेची पूर्ण जबाबदारी आपली असेल असे विचारे यांनी मुख्य पोस्ट मास्तर जनरल यांना सांगितले. त्यावर त्यांनी या इमारतीची पाहणी करून पुढील 2 महिन्यांच्या कालावधीत उचित कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. त्याच बरोबर मीरा-भाईंदर शहरासाठी 3 मुख्य कार्यालये आहेत. भाईंदर पूर्व येथील टपाल कार्यालय धोकादायक झाल्याने हे टपाल कार्यालयही दुसरीकडे तत्काळ स्थलांतरित करावे. कर्मचार्‍यांना बसण्यासाठी टेबल खुर्च्या नसल्याने ते खाली जमिनीवर बसूनच काम करत आहेत. विनाविलंब, विनातक्रार सेवा देण्यासाठी कर्मचारी वर्ग वाढवणे गरजेचे आहे. असेही खासदार विचारे यांनी स्पष्ट केले. 3 हजार कर्मचारी भरतीवरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उठवली असल्याने ही भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येईल, असे दास यांनी सांगितले. महापालिकेने पोस्टसाठी आरक्षित केलेले भूखंड विकत घ्यावे. किंवा मूळ भूखंड मालकाकडून पोस्टाच्या नियमानुसार राखीव क्षेत्रावर बांधकाम करून घेऊन स्वत:च्या हक्काचे कार्यालय बांधून घ्यावे. तसेच भाडेतत्त्वावर सुरू असणारे कार्यालय बंद करावे. अशाही सूचना खासदार विचारे यांनी केल्या.

Previous Post

अभिमानास्पद कामगिरीबाबत नेरूळ पोलिसांचे अभिनंदन

Next Post

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला रौप्यपदक

Next Post
सायना जागतिक बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला रौप्यपदक

रेल्वे पादचारी पूल प्रवाशासाठी – का फेरीवाल्यांसाठी ?

रेल्वे पादचारी पूल प्रवाशासाठी - का फेरीवाल्यांसाठी ?

आरोग्य सभापती पूनम पाटील यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

आरोग्य सभापती पूनम पाटील यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com