• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2015

सांगलीच्या बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिवसेनाही पराभूत

adminbyadmin
in देश - विदेश
0
सांगलीच्या बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिवसेनाही पराभूत

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेसच्या पॅनेलचा १३ विरुद्ध ३ अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला.
बाजार समितीच्या १९ जागांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. विधानसभा निवडणुकीपासून एकमेकांविरोधात ठाकलेल्या जयंत पाटील आणि पतंगराव कदम यांच्यात सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. जिल्हा बँक जयंत पाटील यांनी ताब्यात घेतल्यानंतर पतंगराव कदम यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत जिल्ह्यातील ४० ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. शिराळा बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादीच्या सोबतीने जिंकली. खानापूर बाजार समितीत त्यांनी शिवसेनेशी युती करून कॉंग्रेसच्याच एका विरोधी गटाला सत्तेपासून दूर ठेवले. सांगली बाजार समितीची निवडणूक तिन्ही माजी मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची होती. जिल्हा बँकेत पराभव पत्करावा लागलेल्या माजी मंत्री मदन पाटील यांना या निवडणुकीत सहज विजय मिळाला. पण जयंत पाटील गटाला केवळ तीनच जागांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत आणि सोसायटी गटावर निर्विवाद वर्चस्व मिळवत पतंगराव कदम, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील वसंतदादा रयत पॅनलने १३ जागा जिंकल्या, तर तीन अपक्ष निवडून आले.
लोकसभा-विधानसभेेचे निकाल आणि आर. आर. पाटील यांचे निधन यानंतर सांगली जिल्ह्याचे राजकारण नव्या वळणावर येऊन ठेपले होते. जिल्हा बँक आणि बाजार समिती निवडणुकांनंतर जयंत पाटील आणि पतंगराव असे दोनच प्रभावी गट निर्माण झाले आहेत. वसंतदादा घराणे विभागले आहे. त्यापैकी एक गट जयंत पाटील यांच्यासोबत आहे, तर दुसरा पतंगराव यांच्यासोबत आहे. बाजार समिती निवडणुकीत जयंत पाटील यांनी भाजप आमदार, खासदार यांना सोबत घेतले होते, तर पतंगरावांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नाराजांची मोट बांधली होती.

Previous Post

स्वतःची चप्पल स्वतः हातात घ्यावी!

Next Post

पोलिसांच्या कामगिरीचा अभिमान

Next Post
पोलिसांच्या कामगिरीचा अभिमान

पोलिसांच्या कामगिरीचा अभिमान

ऐरोली रेल्वे स्थानकासमोर एमआयडीसीचा स्कायवॉक

ऐरोली रेल्वे स्थानकासमोर एमआयडीसीचा स्कायवॉक

आरोग्यविषयक कामांना सर्वप्रथम निधी उपलब्ध करून देण्याची मागणी

नवी मुंबईतील शिल्लक प्लॉटचा वापर फक्त गृहनिर्माण प्रकल्पांकरताच करणेकरीता सिडकोला निर्देश देण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com