• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2015

धोकादायक इमारतींचा रहिवास / वापर थांबविणेबाबत जाहीर आवाहन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
धोकादायक इमारतींचा रहिवास / वापर थांबविणेबाबत जाहीर आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०१५-२०१६ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण ९२ इमारती महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम १६४ पोटकलम (१) (२) (३) (४) अन्वये ‘धोकादायक’ इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६५ (अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरु होऊन ३० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींची नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण करुन घेणे अनिवार्य आहे. ३० वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर किंवा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजावयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारशी केलेली दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावे. या प्रकारे संरचना परीक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था/मालक/भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रुपये २५०००/- अथवा सदर मिळकतीचे वार्षिक मालमता कराची रक्कम यातील जी जास्त असेल, तितक्या रकमेचा दंड ठोठवायची तरतूद या अधिनियम ३९८ (अ) खाली अंतर्भूत करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परीक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेस्थळावर उपलब्ध करुन दिलेली आहे.
३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण ३० सप्टेंबर २०१५ पूर्वी पूर्ण करुन याबाबतचा अहवाल संबंधित विभाग अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका व सहाय्यक संचालक, नगररचना नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करावा.
पावसाळा कालावधीत धोकादायक झालेल्या इमारतींचा/घरांचा वापर करणे जिकरीचे आहे. त्यामुळे जिवीत व वित्तहानी होऊ शकते. म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांच्या वतीने नागरिकांना जाहीर आवाहन करणेत येते की, धोकादायक इमारतींचा /घरांचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा अन्यथा दुर्देवीरित्या अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घेण्यात यावी.

Previous Post

महापालिका विषय समिती-उपसभापतींची निवड उत्साहात

Next Post

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ विषयी अभियांत्रिकी विभागाची कार्यशाळा

Next Post
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ विषयी अभियांत्रिकी विभागाची कार्यशाळा

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ विषयी अभियांत्रिकी विभागाची कार्यशाळा

गोविंदवाडी बायपास रस्तारोको आंदोलन प्रकरणी भाजपा नेत्यांची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी

गोविंदवाडी बायपास रस्तारोको आंदोलन प्रकरणी भाजपा नेत्यांची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी

ऑस्ट्रेलियाचा डाव ६० धावात आटोपला

ऑस्ट्रेलियाचा डाव ६० धावात आटोपला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com