• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 21, 2015

चंद्रभागेच्या पात्रात राहुट्यांना परवानगी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
चंद्रभागेच्या पात्रात राहुट्यांना परवानगी

मुंबई : आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट चालणार्‍या लाखो वारकर्‍यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. वर्षातील चार प्रमुख एकादशींसाठी एकूण 20 दिवस चंद्रभागेच्या पात्रात तात्पुरत्या राहुट्या उभारण्यास हायकोर्टानं आज परवानगी दिली आहे. अर्थात, नदी प्रदूषित न करण्याच्या अटीवर त्यांनी ही मुभा दिली आहे.
पंढरपूर वारीनंतर सफाई कामगारांवर हाताने मैला साफ करण्याची वेळ येते, म्हणून ’द कॅम्पेन अगेन्स्ट मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’तर्फे जनहित याचिका करण्यात आली होती. चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न अ‍ॅड. असिम सरोदे यांच्या संस्थेनेही जनहित याचिकेद्वारे हायकोर्टासमोर आणला होता. त्या अनुषंगाने नदीपात्रात कोणत्याही प्रकारचे तात्पुरते निवारे, राहुट्या उभारू नयेत, असा स्पष्ट आदेश हायकोर्टाने 24 डिसेंबर 2014 रोजी दिला होता. अर्थातच, वारकर्‍यांचा त्याला विरोध होता. हा आदेश बदलण्यासाठी त्यांनी कोर्टातही धाव घेतली होती. धार्मिक परंपरा सुरू ठेवण्याचा अधिकार घटनेनं दिल्याचा युक्तिवाद त्यांनी केला होता. परंतु, चंद्रभागेच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधत हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळली होती. वारकर्‍यांना भक्तिभाव जपण्याचा अधिकार आहे, तसाच अन्य नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचाही अधिकार आहे, असं स्पष्ट मत कोर्टानं मांडलं होतं.
या पार्श्वभूमीवर, येत्या 27 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती. कायदा-सुव्यवस्थेची सबब पुढे करत चंद्रभागेच्या पात्रात आणि वाळवंटात तात्पुरत्या राहुट्या उभारण्याची परवानगी राज्य सरकारनं हायकोर्टाकडे मागितली होती. त्याला कोर्टानं सशर्त मंजुरी दिली आहे. भजन, किर्तन, जागरण, प्रवचनासाठी कोरड्या नदीपात्रात तात्पुरते तंबू उभारण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे. वर्षातील 4 एकादशीसाठी 20 दिवस ही मुभा राहील आणि हे दिवस, या तारखा जिल्हाधिकारी निश्रि्चत करतील, असे निर्देश मुख्य न्यायाधीश मोहित शहा आणि ए के मेनन यांनी दिले. त्यामुळे वारकर्‍यांच्या पंढरपुरातील निवासाची व्यवस्था झाली आहे.
दरम्यान, याआधी जानेवारीमध्ये माघी सोहळ्यावेळी दोन दिवसांसाठी नदीपात्रात तात्पुरते निवारे, राहुट्या उभारण्यास कोर्टानं परवानगी दिली होती.

Previous Post

जितेंद्र आव्हाड हल्लाप्रकरणी पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

Next Post

नेव्हीतील जवानांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Next Post
बंदूकीचा धाक दाखवून अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार

नेव्हीतील जवानांनी केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नेरूळमध्ये डेंग्युचा रुग्ण आढळला

नेरूळमध्ये डेंग्युचा रुग्ण आढळला

वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालयादरम्यान पामबीच मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी

वाशी रेल्वे स्थानक ते महापालिका मुख्यालयादरम्यान पामबीच मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com