• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 11, 2015

मुंबईत 552 धोकादायक इमारतींची भर

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुंबईत 552 धोकादायक इमारतींची भर

मुंबई : प्रत्येक वर्षी पावसाळा आल्यानंतर मुंबईतल्या धोकादायक इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर येतो. मागील वर्षी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या 772 इमारतींवरील बीएमसीची कारवाई यंदाचा पावसाळा आला तरी संपलेली नाही. त्यातच यंदाही 552 धोकादायक इमारतींची भर पडली आहे.
मुंबईतल्या धोकादायक इमारती खाली करून त्या तात्काळ पाडल्या जात नसल्यानं मानवी जीवाची फार मोठी किंमत अनेकदा मोजावी लागलीय. मागील वर्षी मुंबई महापालिकेनं 772 इमारती अती धोकादायक म्हणून जाहीर केल्या होत्या. त्यातल्या सुमारे 250 इमारती मोकळ्या करून पाडण्याचं काम सुरू आहे. तर उर्वरीत प्रकरणात कोर्टानं स्टे दिला असल्यानं बीएमसी आता या प्रकरणांमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे.
यावर्षीही बीएमसीनं 552 इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. या इमारतींना पालिकेनं आता नोटीसा देण्यास सुरूवात केलीय. याव्यतिरिक्त बीएमसीच्या मालकीच्या 124 इमारतीही अतिधोकादायक स्थितीत आहेत.
धोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या रहिवाशांचा इमारत खाली करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव प्रशासनाला आहे. यामध्ये रहिवाशांचीही काही चूक नाही. कारण ट्रान्झिट कॅम्पमध्ये वर्षानुवर्षं सडत असलेल्या लोकांचा अनुभव ते ऐकून आहेत. त्यातच एकदा सोडलेलं घर परत कधी मिळेल याचीही खात्री नाही. तसंच सरकार, पालिका आणि बिल्डरांवर विश्‍वास नसल्यानं, नागरिक धोकादायक इमारतीतच राहणं पसंत करतात.
जीव मुठीत घेवून जगणार्‍या या इमारतींमधल्या रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढण्याऐवजी, त्यांना तिथंच लवकरात लवकर घर मिळवून देणं गरजेचं आहे. त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. नाही तर दरवर्षी घडणार्‍या इमारत दुर्घटनांमधून काहीच धडा घेतला गेला नाही, अशी चर्चा आहे.

ठळक बाबी
* मागील वर्षी महापालिकेकडून 772 इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर
* त्यापैकी सुमारे 250 इमारती मोकळ्या करून पाडण्याचं काम सुरू
* उर्वरीत प्रकरणात कोर्टानं स्टे दिल्यानं बीएमसी प्रतिज्ञापत्र दाखल करणार
* यावर्षी बीएमसीकडून 552 इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर
* या इमारतींना पालिकेकडून नोटीस द्यायला सुरुवात
* बीएमसीच्या मालकीच्या 124 इमारतीही अतिधोकादायक स्थितीत

Previous Post

प्रेम केलं म्हणून त्या दोघांना गावकर्‍यांनी मूत्रप्राशन करण्यास भाग पाडले

Next Post

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत ‘धोनी’

Next Post
फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत ‘धोनी’

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत ‘धोनी’

मनपाने केल्या जाहीर नवी मुंबई शहरातील 13 शाळा अनधिकृत

मनपाने केल्या जाहीर नवी मुंबई शहरातील 13 शाळा अनधिकृत

मराठी भाषेबद्दल द्वेष दाखवल्याबद्दल राष्ट्रवादी व शिवसेना स्थायी समिती सदस्यांचा जाहीर निषेध!!!

मराठी भाषेबद्दल द्वेष दाखवल्याबद्दल राष्ट्रवादी व शिवसेना स्थायी समिती सदस्यांचा जाहीर निषेध!!!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com