• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 6, 2015

एक तरी झाड लावा आणि जगवा – आ. संदीप नाईक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
एक तरी झाड लावा आणि जगवा – आ. संदीप नाईक

नवी मुंंबई : ग्रीन होप आणि जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती पर्यावरण व वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने सालाबादप्रमाणे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. प्रत्येक नागरिकाने एक तरी वृक्षरोपाची लागवड करुन ते जगवावे, असे आवाहन आमदार संदीप नाईक यांनी केले.
ऐरोलीच्या सेक्टर-15 येथे निर्माणाधीन असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारील मैदानात या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ वृक्षरोपे लावून करण्यात आला. ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समितीच्या सभापती नेत्रा शिर्के आदींनी वृक्षरोपे लावली.
पर्यावरण रक्षणाची मोहीम प्रभावी करायची असेल तर नागरिकांचा सहभाग त्यामध्ये महत्त्वाचा असल्याचे मत आमदार नाईक यांनी व्यक्त केले. ग्लोबल वॉर्मिंगचा वाढलेला धोका पाहात लोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांची लागवड होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. डोंगराळ भाग, औद्योगिक परिसर इत्यादी ठिकाणांसोबतच खाडीकिनारी पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी खारफुटीचे रोपण आवश्यक असून ग्रीन होपच्यावतीने वर्षभर नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात येते अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्या भागात कोणत्या प्रकारची झाडे लावावीत याविषयीचे मार्गदर्शन त्याचबरोबर वृक्षरोपांचे वाटपही ग्रीन होपच्यावतीने मोफत करण्यात येते आहे, असे ते म्हणाले. वृक्ष रोपे लावली म्हणजे आपण आपले कर्तव्य पार पाडले असे नाही तर ही वृक्षरोपे जगविणे देखील तितेकच महत्त्वाचे आहे. रबाळे येथील डोंगराळ भागात महापौर सुधाकर सोनावणे ग्रीन होपच्या माध्यमातून निर्माण केलेली हिरवाई हे त्याचे आदर्श उदाहरण असल्याचे आमदार नाईक यांनी नमूद केले. शेततळी, मायक्रो इरिगेशन आदी संकल्पनाच्या माध्यमातून जेथे पाणी उपलब्ध होणे कठीण आहे त्याठिकाणी देखील वृक्षांना उत्तम प्रकारे पाणी देता येते, अशी सूचना त्यांनी केली.
नेरुळ येथील एनआरआय कॉलनी परिसरात ग्रीन होपच्यावतीने वृक्षारोपण मोहिमेचा दुसरा कार्यक्रम पार पडला. येथे माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते वृक्षरोपे लावण्यात आली. जयंत हुदार आणि इतर वृक्षप्रेमी नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.

Previous Post

चार वर्षात जयललितांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

Next Post

अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती – सनी लिऑन

Next Post
अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती – सनी लिऑन

अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती - सनी लिऑन

दहावीच्या निकालाची तारीख पुढे ढकलली

दहावीच्या निकालाची तारीख पुढे ढकलली

मोदींच्या वर्षभराच्या कामाची पंतप्रधान कार्यालयालाच माहिती नाही?

मोदींच्या वर्षभराच्या कामाची पंतप्रधान कार्यालयालाच माहिती नाही?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com