• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 13, 2014

नाहटा अपरिपक्व, पराभव समारे दिसू लागल्याने बरळू लागले

adminbyadmin
in ठाणे
0
नाहटा अपरिपक्व, पराभव समारे दिसू लागल्याने बरळू लागले

* डॉ. संजीव नाईक यांचा टोला
सुजित शिंदे
नवी मुंबई : नजरेसमोर पराभव स्पष्ट दिसू लागल्याने बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजय नाहटा हे काहीही बरळू लागले असून खोटे-नाटे आरोप करु लागले असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांनी नाहटा यांना लगावला आहे.
नाहटा यांनी आज (ता.१३) पत्रकार परिषद घेऊन सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या शासन निर्णयाचा जो लेखी पुरावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे काल रविवारच्या (ता.१२) पत्रकार परिषदेमध्ये सादर करण्यात आला, तो खोटा असल्याचे निरर्थक विधान केले आहे. त्यावर डॉ.नाईक यांनी खुलासा करताना सांगितले की, माहिती अधिकाराच्या अंतर्गत प्राप्त केलेल्या कागदपत्रांचा हा पुरावा असून स्वत: प्रशासकीय पदावर काम केलेल्या नाहटा यांना या कागदपत्रांच्या खरेपणा विषयी शंका यावी याचे आश्‍चर्य वाटते.
विकास कामांचे भूमिपूजन करताना आणि त्यानंतर या विकास कामांच्या उद्घाटनास राष्ट्रवादीचे नेते उपस्थिती लावतात. मधल्या काळात या विकास कामांना भेटी देत नाही, अशा केलेल्या बिनबुडाच्या टीकेचादेखील नाईक यांनी खरपूस समाचार घेतला आहे. विकास कामांच्या पाहणी दौर्‍याची, आढावा बैठकांची, प्रत्यक्ष भेटीची इत्यादी विषयी सविस्तर माहिती हवी असेल तर आमच्या उमेदवारांनी प्रसिध्द केलेल्या त्यांच्या कार्य अहवालाचा नाहटांनी जरुर अभ्यास करावा म्हणजे त्यांना कळेल विविध विकास कामांच्या यशस्वी पूर्ततेसाठी आम्ही किती परिश्रम घेतले आहेत. जर नाहटांना आणखी पुरावे हवे असतील तर ते आम्ही केव्हाही त्यांना द्यायला तयार आहोत, असे आवाहन नाईक यांनी केले आहे.
महापालिकेत केवळ प्रशासकीय अधिकारी असणारे नाहटा या शहरात झालेल्या विकास कामांचे श्रेय उपटण्याचा करीत असलेला प्रयत्न हास्यास्पद आहे.कोणतेही विकास काम न केल्याने त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणूनच खोटे बोला पण रेटून बोला, अशा पध्दतीने नागरिकांची दिशाभूल नाहटा करीत आहेत. त्यांना येत्या १९ ऑक्टोबर रोजी निवडणूक निकालाच्या दिवशी त्यांची जागा काय आहे हे कळून येईल, असे नाईक म्हणाले.
विलास जाधव खून प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे. विलास जाधवच्या कुटुंबियांनी न्यायालयीन लढा सुरु ठेवला आहे. या प्रकरणी विलासच्या कुटुंबियांनीच शिवसेनेच्या उमेदवारावर आरोप केले आहेत. आपला उमेदवार अडचणीत आल्याने नाहटा त्याची कातडी वाचविण्यासाठी असे आरोप करीत आहेत.

Previous Post

सामाजिक संघटनांचा संदीप नाईक यांना पाठिंबा

Next Post

घणसोली ते वाशीदरम्याच्या रॅलीत मनसेचा झंझावात

Next Post

घणसोली ते वाशीदरम्याच्या रॅलीत मनसेचा झंझावात

पालघरमध्ये ४८ गावांचा निवडणुकीवर बहीष्कार

राजकारण्यांचा उत्साह मतदानातही दिसला

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com