• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 10, 2014

भाजपाच्या जाहीरनाम्यात ‘वेगळ्या विदर्भा’चा उल्लेखच नाही!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

मुंबई : राज्यात सत्ता आल्यावर विदर्भ वेगळा करण्याची दवंडी प्रदेश भाजपचे नेते सर्वत्र पिटत असले, तरी त्यांनी आज प्रकाशित केलेल्या ‘दृष्टिपत्र’ नावाच्या जाहीरनाम्यात या विषयाचा उल्लेखच नसल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखंड महाराष्ट्राचा नारा दिल्यानं प्रदेश नेत्यांची गोची झाल्यामुळेच हा विषय ‘दृष्टिपत्रा’तून सोयीस्करपणे वगळण्यात आल्याचं बोललं जातंय.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार धुरळा उडवून दिल्यानंतर, ‘स्टार प्रचारक’ नरेंद्र मोदींच्या दणदणीत सभांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना, ‘एक्झिट पोल’मध्ये ’कमळ’ उमलल्याचं दिसत असताना भाजपनं आपला सर्वसमावेशक जाहीरनामा प्रकाशित केला आहे. ‘समृद्ध महाराष्ट्राची हमी देणारं दृष्टिपत्र’, असं ब्रीदवाक्य असलेल्या या जाहीरनाम्यात शेती, शिक्षण, उद्योग, पर्यटन, पर्यावरण, महिला विकास, सामाजिक न्याय, आदिवासी कल्याण, सर्वांना पाणी, मुंबई आणि महानगरांचा विकास, युवक कल्याण, सुरक्षा, महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता अशा १७ क्षेत्रांमध्ये आपण काय-काय करू, याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या सगळ्याच मुद्द्यांवर भरभरून लिहिलं असलं, तरी या जाहीरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा उल्लेख नसल्याची बाब सगळ्यांनाच खटकतेय. अर्थात, छोटी राज्य करण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम असल्याचं त्यात स्पष्ट करण्यात आलंय. पण मग, वेगळ्या विदर्भाचा उल्लेख का टाळला, याबद्दल संशय आहे.
नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेत, अशी टीका शिवसेना-मनसेकडून सातत्यानं होतेय. त्यावर, आपण दिल्लीत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, अशी ग्वाही स्वतः मोदींनी दिली आहे. पण प्रदेश भाजपचे नेते त्यानंतरही वेगळ्या विदर्भावर ठाम आहेत. अशावेळी त्यावरून आणखी घोळ, गोंधळ होऊ नये म्हणूनच भाजपनं सावध भूमिका घेतली असावी, असं राजकीय जाणकारांना वाटतंय. त्याबद्दल ते काय खुलासा करतात आणि विदर्भवाद्यांना कसं ’पटवतात’, हे बघावं लागेल.
** भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा **
* राज्यातील पेट्रोलचे दर कमी करू.
* एलबीटी रद्द करू.
* ६० वर्षं वयाच्या मात्र नोकरी नसलेल्या महिलांना मासिक पेन्शन
* आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आरक्षण देणार.
* मराठी शाळांच्या आर्थिक सबलीकरणासाठी प्रयत्न
* आयटी उद्योग विकास प्राधिकरणाची स्थापना
* दहशतवाद व नक्षलवादाचा सामना करताना हुतात्मा झालेल्या वा कायम अंपगत्व आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांसाठी विशेष आधार योजना.
* स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्‍यांचा जीव वाचविण्याचे धैर्य दाखविणार्‍या बालवीरांसाठी हुतात्मा तुकाराम ओंबळे बालवीर पुरस्कार.
* राज्यातील प्रमुख शहरांमध्ये माहिती तंत्रज्ञान व्यवसाय विकसित करण्यासाठी आयटी उद्योग परिसर विकास प्राधिकरण.
* शेतकर्‍यांना वृद्धापकाळात मदत होण्यासाठी अन्नदाता आधार पेन्शन योजना.
* कांदा, कापूस, टोमॅटो इत्यादी शेतमालाचे भाव अनैसर्गिकरित्या कोसळले तर भरपाईसाठी कृषी उत्पादन सुरक्षा निधीची निर्मिती.
* राज्यातील सर्व पाटबंधारे व जलसंधारण योजनांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये झालेला भ्रष्टाचार शोधून त्यामध्ये गुंतलेल्या राजकीय व प्रशासकीय व्यक्तींवर कठोर कारवाई.
* ठराविक मुदतीत सरकारी कामे पूर्ण होण्याची हमी देणारा महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा.
* सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी स्वतंत्र नियामक व्यवस्था.
* ऊसतोडणी कामगारांच्या कल्याणासाठी गोपीनाथ मुंडे महामंडळ.
* झोपडपट्ट्या, आदिवासी पाडे व ग्रामीण भागात दवाखाने चालवण्यासाठी डॉक्टरांना सुलभ कर्ज.
* डिजिटल मराठी प्रोत्साहन योजना.
* शिवछत्रपतींची प्रेरक स्मृती जागवण्यासाठी पर्यटनाची नवी छत्रपती शिवाजी पर्यटन योजना.
* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारणार.

Previous Post

दहशत माजविणार्‍यांना त्यांची जागा दाखवून द्या !

Next Post

दिल्ली सरकारबाबत निर्णय दिवाळीनंतरच!

Next Post
दिल्ली सरकारबाबत निर्णय दिवाळीनंतरच!

दिल्ली सरकारबाबत निर्णय दिवाळीनंतरच!

नवी मुंबई हे माझे कुटूंबच- लोकनेतेे गणेश नाईक

नवी मुंबई हे माझे कुटूंबच- लोकनेतेे गणेश नाईक

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बेलापुर मतदारसंघात कॉंग्रेसची मुसंडी

वाशी गावासह सानपाडा पामबीचच्या मतदानावर कॉंग्रेसची खरी मदार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com