नवी मुंबई : वटपौर्णिमेनिमित्त स्वत:च्या पतीदेवाच्या आयुष्यासाठी मनोकामना करताना व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी साकडे घालताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच वृक्षसंपदा वाढविण्यासाठी सोमवारी (दि. १० जुन) भाजपाच्या माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांच्या अभिनव पर्यावरणपूरक संकल्पनेतून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षाची लागवड करणे गरजेचे असल्याने वट पौर्णिमेनिमित्त नेरूळ पश्चिम येथील श्री झोटिंगदेव बामणदेव मैदान परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी भाजपा माजी नगरसेविका रुपाली किस्मत भगत, प्रमिला दिंगबर गिरी, उषा रविंद्र भगत, कविता सोमनाथ भगत, नमिता नंदेश भगत, रसिका संदीप कुमार उपस्थित होत्या.
वृक्षारोपण आज काळाची गरज असून प्रत्येकाने वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन करुन पुढच्या पिढीलाही सावली मिळावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. वृक्षसंपदेतून ऑक्सिजननिर्मिती तसेच पर्यावरणात समतोलही राहतो. जगात वृक्षसंपदा घटत चालल्याची आपल्याला फार मोठी किमंत मोजावी लागली असून प्रत्येकाने वेळीच सावध होऊन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या आपल्या जबाबदारीचे पालन करावे , असे आवाहन भाजपाच्या माजी नगरसेविका सौ. रुपाली किस्मत भगत यांनी यावेळी केले.