• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2024

मुंबई विद्यापिठ वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची एमआयएमची मागणी

adminbyadmin
in मुंबई
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदनातून घातले साकडे

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई  : मुंबई विद्यापिठातंर्गत असलेल्या वसतीगृहासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी विद्यापिठ प्रशासनाला निर्देश देण्याची लेखी मागणी एमआयएमचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव आणि नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

मुंबई विद्यापिठाचा देशातच नाही तर जगभरात नावलौकीक आहे. या विद्यापिठातंर्गत येणाऱ्या वसतीगृहातील समस्यांबाबत, असुविधांबाबत तेथे वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून (दि. १२ ऑगस्ट) उपोषण आंदोलन पुकारले. कलिना संकुलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला होता. वसतीगृहातील गैरसोयी, निकृष्ठ व सुमार दर्जाची खानपान सेवा, नुकतीच करण्यात आलेली पाच हजार रुपयांची दरवाढ याविरोधात नाराजी व संताप व्यक्त करत विद्यार्थ्यानी आंदोलनाचा मार्ग स्विकारला. याशिवाय वसतीगृहाच्या भोजनगृहातील अस्वच्छता, मध्यवर्ती वाचनालयाच्या वेळा, वायफाय सुविधा, विद्यापिठातील कलिना संकुलातील पाणी समस्या याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. विद्यार्थ्यांनी या समस्या व सुविधांबाबत वारंवार लेखी पाठपुरावा करुनही विद्यार्थ्याची दखल घेतली जात नाही. चर्चेसाठी बोलावतात, आश्वासने देतात, अंमलबजावणी होत नाही. हा घडत असलेला प्रकार योग्य नाही. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी असुविधा, समस्या सोडविण्यासाठी उपोषण आंदोलन करावे लागणे, हे चित्र महाराष्ट्राच्या संस्कृतीला व गौरवशाली परंपरेला भुषणावह नाही. समस्येचे गांभीर्य पाहता, आपण तातडीने मुंबई विद्यापिठाला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.

Previous Post

जुईनगर, नेरूळमध्ये आरोग्य शिबिर राबविण्याची कॉंग्रेसची मागणी

Next Post

नवी मुंबईतील खासगीसह पालिका शाळेतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची कॉंग्रेसची मागणी

Next Post
शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

नवी मुंबईतील खासगीसह पालिका शाळेतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची कॉंग्रेसची मागणी

जखमी गोविंदाला भाजपाकडून सव्वा लाखाची मदत

जखमी गोविंदाला भाजपाकडून सव्वा लाखाची मदत

नेरूळ, जुईनगरमधील उद्यानात वाढलेले जंगली गवत हटविण्याची काँग्रेसची मागणी

नेरूळ, जुईनगरमधील उद्यानात वाढलेले जंगली गवत हटविण्याची काँग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com