• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2024

अॅक्शनला रिअॅक्शन येणारच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

adminbyadmin
in मुंबई
0
अॅक्शनला रिअॅक्शन येणारच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यात शनिवारी रात्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यामुळं ठाण्यात रात्रभर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खरी सुरुवात ही राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये झाली. मराठवाड्यात राज ठाकरेंचा ताफा अडवला गेला. त्याच ॲक्शनला आज रिअॅक्शन दिल्याचे शनिवारी रात्री पाहायला मिळाले, परंतू, असे आंदोलन कोणालाच अपेक्षित नसते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकार स्थापन झाल्यावर विरोधक म्हणाले, हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार पडणार आहे. परंतू, असे झाले नाही. सरकार अधिक मजबूत होत गेले. आम्ही बाळासाहेब यांचे विचार कधीही सोडले नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यांना अशा प्रकारचा सामना करावा लागतो, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. सत्तेसाठी कुठलेही कॉम्प्रमाईज आम्ही विचारांशी करणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, असे ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्ट्राईकरेट पाहिला तर लोकांची पसंती कोणाला आहेत ते पाहावे. ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला सांगतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. हे लोक आम्हाला दिल्लीतले सांगतात. आधी दिल्लीतली लोकं मातोश्रीमध्ये यायची आणि हे लोक आता मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. आम्ही दिल्लीला जातो ते राज्यातील विकासासाठी जातो. आम्ही कुठलेही काम लपून-छपून करत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून आम्ही दिल्लीला जात नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आता अनेक लोक बोलत फिरत आहेत की, मला मुख्यमंत्री करा. पण आम्ही तसे कधीच केले नाही. मुख्यमंत्रीपदासाठी कधीही विचारांशी गद्दारी केली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. आजही ते ठाण्यातून दाढीबद्दल बोलले. परंतू, त्यांना दाढीची धास्ती आहे. त्यांना माहिती आहे, याच दाढीने आपली गाडी खड्ड्यात घातलेली आहे. मिमिक्री करणे हेच काम त्यांना आता उरलेले आहे. बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी अशा प्रकारचे काम केले असते तर बाळासाहेबांनी त्यांना जंगलात फोटोग्राफी करण्यासाठी पाठवले असते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Previous Post

कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय लवकर घ्या : माथाडी नेते पांडुरंग आमले यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे परिवहन व्यवस्थापकांना साकडे

Next Post
कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे परिवहन व्यवस्थापकांना साकडे

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे परिवहन व्यवस्थापकांना साकडे

नवी मुंबईतील बंद झालेली सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा पुन्हा सुरु

जनसेवा हीच ईश्वर सेवा : आ.मंदा म्हात्रे

नेरूळ-जुईनगरमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची कॉंग्रेसची मागणी

जुईनगर, नेरूळमध्ये आरोग्य शिबिर राबविण्याची कॉंग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com