• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 9, 2024

कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय लवकर घ्या : माथाडी नेते पांडुरंग आमले यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय लवकर घ्या : माथाडी नेते पांडुरंग आमले यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धोकादायक कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा लवकर निर्णय घेऊन बाजार आवारातील घटकांच्या डोक्यावर असलेली मृत्यूची टांगती तलवार दूर करण्याची लेखी मागणी भाजयुमाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांदा बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजी मार्केट, धान्य मार्केट, किराणा दुकान मार्केट कार्यरत आहेत. या पाच मार्केटमध्ये असणाऱ्या कांदा बटाटा मार्केटची अवस्था धोकादायक आहे. महापालिका प्रशासनाने हे मार्केट धोकादायक घोषित करुनही दोन दशकापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. या मार्केटमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही कांदा, बटाटा, लसून विक्रीसाठी येत आहे. मार्केटमध्ये दररोज व्यापारी, माथाडी, मापाडी, वारणार, मेहता कर्मचारी, पालावाल महिला, बाजार समितीचे कर्मचारी-अधिकारी, ट्रान्सपोर्ट वर्गातील बाहेरगावचे वाहतुकदार, क्लिनर तसेच स्थानिक वाहतुकदार, किरकोळ विक्रेते अशा स्वरूपात दररोज ५० हजाराहून अधिक जिवित घटकांचा वावर असतो. मार्केट कार्यरत झाल्यापासून गाळ्यात छतातून वाळू गळणे, स्लॅप कोसळणे, भिंतीतून लोखंडी सळ्या बाहेर येणे, वाहन लावण्याच्या धक्क्यावर समस्या निर्माण होणे अशा घटना सातत्याने घडतच गेल्या आहेत. मुळातच हे मार्केट बनवितानाच सिडकोने निकृष्ठ दर्जाचे बनविल्याने मार्केट कार्यरत झाल्यापासून बांधकामविषयक दुर्घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामध्ये धोकादायक मार्केटचा भाग कोसळल्यास जिवितहानी अटळ आहे. समस्येचे गांभीर्य पाहता बाजार आवारातील संभाव्य जिवितहानी टाळण्यासाठी आपण बाजार समिती आवारातील धोकादायक घोषित केलेल्या कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याची मागणी माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Previous Post

नवी मुंबई महापालिका शाळेतील मुलांना झालेल्या गणवेश विलंब प्रकाराची चौकशी करण्याची एमआयएमची मागणी

Next Post

अॅक्शनला रिअॅक्शन येणारच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
अॅक्शनला रिअॅक्शन येणारच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अॅक्शनला रिअॅक्शन येणारच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे परिवहन व्यवस्थापकांना साकडे

कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे परिवहन व्यवस्थापकांना साकडे

नवी मुंबईतील बंद झालेली सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा पुन्हा सुरु

जनसेवा हीच ईश्वर सेवा : आ.मंदा म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com