• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 28, 2024

भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही : नारायण राणे

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही : नारायण राणे

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे नाहीत, त्यामुळे त्यांची आठवण येते. पाठिंबा दिला त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानतो. मनसेने माझ्यासाठी भव्य सभा आयोजित केली. मनसेची सभा आणि उबाठा गटाची सभा हा योगायोग आहे. उबाठा म्हटले की उलटी आल्यासारखे वाटते. मनसे आणि माझे जवळचे संबंध आहेत. मला मत म्हणजे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे. चांगल्याला चांगले म्हणायची वृती राज ठाकरेंकडे आहे, असे महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे म्हणाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राणेंच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. ही सभा शिर्के हायस्कूल मैदान येथे पार पडली. 

नारायण राणे म्हणाले, जो माणूस आवडत नाही त्याबद्द्ल प्रश्न विचारले जातात. मोदींनी जगाच्या अर्थ व्यवस्थेत भारताला पुढे आणलं.  मोदींची कामाची आणि निर्णय घेण्याची पद्धत देशाच्या हिताची आहे. ही सगळी धोरण राज ठाकरेंना आवडली म्हणून त्यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा दिला. निवडून आलो तर सांगाल ती कामे वर्षाच्या आत करण्याची माझी क्षमता आहे. 

मनसैनिक आणि माझ्यात काही फरक मानत नाही. भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरे यांच्यासोबत माझे राजकारणापलिकडचे आहेत. बाजूच्या सभेत विचारवंत काय बोलतात यासाठी कार्यकर्ता पाठवला होता. मोदींवर टीका, शाहांवर टीका केली.  खोके खोके बोलता तर मी मातोश्रीवर बोके सोडलेले नाहीत. माझ्या एवढे मातोश्री कोणाला माहित नाही. वेळ आली तर सगळे काढेन. मोदींवर बोलला तर रस्ते बंद करेन, असा इशाराही नारायण राणे यांनी दिला. उध्दव विकृत माणूस आहे. दुसऱ्याच चांगलं पाहवत नाही. चाळीस वर्षे सोबत होतो. उध्दवनी महाराष्ट्राची लाज घालवली. जीडीपीच्या प्रश्नावर उध्दव निरुत्तर झाले होते.  कोकणात आग लावायला आलेत. काही द्यायला आलेले नाहीत. दोन्ही जिल्ह्यातील गावे आणि तालुके माहित नाहीत, असेही नारायण राणे यांनी सांगितले.

 

Previous Post

महाविकास आघाडीची उरणमध्ये प्रचारात आघाडी

Next Post

मुख्यमंत्री महोदय, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या : जयेश खांडगेपाटील

Next Post
मुख्यमंत्री महोदय, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या : जयेश खांडगेपाटील

मुख्यमंत्री महोदय, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या : जयेश खांडगेपाटील

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: संदीप खांडगेपाटील

विनाभूसंपादन शेतीवर शासकीय अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या परिवाराला न्याय देण्याची एमआयएमची मागणी

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमणावर पंतप्रधानाकडे सोशल मीडियावर दाद मागताना जुन्नरचा मराठा समाजाचा शेतकरी

व्यक्तिगत टीकेला विकासकामांच्या पाठबळावर मोदींचे प्रत्युत्तर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com