• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 1, 2024

निवडणूक सर्व्हेचे अंदाज हे भाजपासाठी दिलासादायी

adminbyadmin
in संपादकीय
0
आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब न्याय द्या अथवा आम्हा पिडीत दोन शेतकरी परिवाराला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या : संदीप खांडगेपाटील

जयेश रामचंद्र खांडगे याजकडून

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका आता जेमेतेम दोन महिन्यांनी संपन्न होणार आहेत. आठ-दहा दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागून निवडणूक कार्यक्रम जाहिर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूका जवळ आल्यावर अनेक वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, तसेच खासगी संस्था जनसामान्यांच्या मनाचा कल घेत निवडणूक निकालाबाबतचे संभाव्य अंदाज या सर्व्हेमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारावर व्यक्त करत असतात. अर्थात हा प्रकार आपल्या देशात आज पहिल्यांदा घडतोय अशातला प्रकार नाही. गेल्या दोन-अडीच दशकाहून अधिक काळ हा प्रकार चालत आलेला आहे. गृहविभागही आपल्या माध्यमातून अंदाज व्यक्त करत असतो. त्यामुळे प्रत्येक शासकीय, बिगर शासकीय यंत्रणा, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, खासगी संस्थांनी व्यक्त केलेल्या निवडणूकपूर्व चाचण्यांतील अभिप्राय, अंदाज यामधून जनसामान्यांचा कल प्रत्येक राजकीय संघटनांना, पक्षाला, नेतृत्वाला माहिती पडत असतात. सर्व्हे शंभर टक्के बरोबर नसले तरी ८५ ते ९० टक्के खरे ठरत असल्याचे गेल्या अनेक निवडणूकांमध्ये पहावयास मिळालेले आहे. फार फार जागांच्या बाबतीत पाच-दहाच्या फरकाने अंदाज इकडे-तिकडे होत असतात. पण सत्ता कोणाची येणार आणि कोणाला सत्ता गमवावी लागणार हे मात्र निवडणूक निकाल पूर्व सर्व्हेतून माहिती पडण्यास मदत होत असते. दोन महिन्यांनी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीचे अंदाज, सर्व्हे वृत्तवाहिन्यांनी गेल्या काही दिवसांपासून  जाहिर करण्यास सुरुवात केलेली आहे. या सर्व्हेमध्ये देशामध्ये तिसऱ्यांदा भाजपाचेच सरकार येणार आणि देशातील मतदार हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणार. विरोधकांना या निवडणूकीत फारसे यश मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व्हेच्या अंदाजामुळे भाजपा व मित्र पक्षांमध्ये उत्साह निर्माण करणारे असून विरोधी पक्षांना मात्र निराश करणारे आहेत. २०१४ पासून लोकसभा निवडणूकीपूर्वी  निर्माण झालेली भाजपाची लाट भारतीय मतदारांच्या मनावर आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेसच्या कारभाराला, भ्रष्टाचारी राजवटीला खऱ्या अर्थांने भारतीय मतदार कंटाळले होते, परंतु सक्षम पर्याय नसल्याने त्यांना कॉंग्रेसलाच पसंती द्यावी लागत होती. परंतु २०१४च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर खऱ्या अर्थांने हे चित्र बदलले असून आजही तेच चित्र कायम आहे. नजीकच्या भविष्यात या चित्रामध्ये बदल होण्याची सुतरामही शक्यता नाही. सर्व्हे, निवडणूक अंदाज यामधून हे स्पष्ट झालेले आहे. २०१४ साली ‘अब की बार, मोदी सरकार’, ‘अच्छे दिन आयेंगे’ या दोनच घोषणांनी समस्त भारत देश भारावून गेला होता. भाजपाच्या यशात या या दोन स्लोगनचा सिंहाचा वाटा होता, हे भाजपाच्याच लोकांना नाही तर विरोधकांनाही नाकारता येणार नाही. स्लोगन वास्तववादी आणि भावनेला स्पर्श करणारे असेल तर लोक त्याला पसंती मतदानातून देतात. अर्थात आपल्या देशात हे प्रथमच घडले आहे, अशातला भाग नाही. देशाचे कणखर व पोलादी नेतृत्व असलेल्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढताना तत्कालीन परिस्थितीत ‘गरीबी हटाव’ची घोषणा देत मतदारांना भुरळ पाडत कॉंग्रेसने देशाची सत्ता संपादन केली होती.

सतत सत्तेमध्ये राहणाऱ्यांच्या विरोधात नकळत जनमत तयार होते आणि सत्ताधाऱ्यांना लोकप्रियतेला ओहोटी लागून विरोधकांना वातावरण अनुकूल होत असते. भारतीय लोकशाहीमध्ये हे केंद्र पातळीवर तसेच विविध राज्यांमध्ये हे पहावयास मिळालेले आहे. पण या समीकरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपवाद ठरले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका जिंकत परत सत्ता मिळविली व आता दाखवत असलेले सर्व्हे व निवडणूक पर्व अंदाजातूनही २०१४ ला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाच सत्तेवर येणार असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. २०१४ सालानंतरच्या दहा वर्षातील देश कारभाराचा आढावा पाहिल्यास मोदींच्या लोकप्रियतेला कोठेही ओहोटी लागलेली नसून लोकप्रियतेचा आलेख उंचावतच चालला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पक्ष संघटनेला जे ‘अच्छे दिन’ आले आहेत, ते यापूर्वीही कधीही आले नव्हते. सलग तीन वेळा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मान नेहरूनंतर केवळ मोदी यांनाच प्राप्त होणार आहे. नेहरूंनी १७ वर्षे पंतप्रधान पदावरून देशाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळलेली आहे. २०१४ पूर्वीचा आपला देश आणि २०१४ नंतर मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांमध्ये वाटचाल करणारा भारत देश यामध्ये जमिन आसमानचा फरक पडला आहे आणि तो बदल केवळ मोदींच्या नेतृत्वामुळेच शक्य झालेला आहे, हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. जागतिक पातळीवर कोणत्या गटात न जाता केवळ तटस्थ राहणारा देश ही आजवरची आपल्या देशाची प्रतिमा होती. पण मोदींच्या नेतृत्वाखाली तटस्थ राहणारा नाही तर जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारा देश ही नवी ओळख आपल्या देशाची निर्माण झालेली आहे. पूर्वी आपल्या शेजारचे लिंबू टिंबू देशही आपल्याला गुरकावण्याची आगळीक करत असायचे, परंतु मोदी पर्वानंतर शेजारील राष्ट्र तर सोडाच, पण जगाच्या कानाकोपऱ्याततील देशांमध्येही भारताची एक आदरयुक्त प्रतिमा मोदीपर्वामध्ये निर्माण झालेली आहे. केवळ पृथ्वीवरील भुभागावर नाही तर अंतराळातही भारताच्या नावाची दखल घ्यावयास मोदींनी भाग पाडले आहे. वैज्ञानिक, सामाजिक, शैक्षणिक. क्रिडा, आर्थिक, लष्करी सर्वच बाबतीत आपला देश मोदींच्या नेतृत्वाखाली प्रगती करत असतानाच एक हिंदू देश, हिंदूंचा देश अशी भारताची प्रतिमा अलीकडच्या  काळात जागतिक पातळीवर भारताची निर्माण झालेली आहे. आजवर आपल्या देशात हिंदू बहूसंख्य असतानाही अल्पसंख्यांकाच्या दबावाखाली ते वावरत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. कॉंग्रेसने आपल्या राजवटीत बहूसंख्यांक असणाऱ्या हिंदूंना डावलून अल्पसंख्यांकांना धार्जिणे असणारे राजकारण केल्याने हिंदूस्थानच्या भूमीवर हिंदूंनाच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. परंतु २०१४ नंतर या चित्रामध्ये बदल झाला आहे. हिंदूंना हिंदूच्याच भूमीला मानसन्मानाची वागणूक मिळू लागली आहे. हिंदूंच्या अस्तित्वालाही किंमत प्राप्त झालेली आहे. पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माण झाले आहे. पाण्याखाली जावून द्वारकेचे दर्शन घेण्याचा दिवस आता समीप आला आहे. मोदींमुळे सर्वच क्षेत्रात देशाचा कायापालट होत असल्याची भारतवासियांना जाणिव आहे. त्यांनी २०१४ नंतर देशाचा होणारा विकास व जागतिक पातळीवर बदलत असलेली भारताची प्रतिम त्यांनी जवळून पाहिली आहे, अनुभवली आहे. त्यामुळे २०२४च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदारही पंतप्रधान मोदींच्या कार्यावर मतदानातून पोचपावती देण्यास नक्कीच उत्सूक असणार  आणि याचेच प्रतिबिंब जनमत चाचण्यांच्या कलातून निर्माण झालेल्या सर्व्हेमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

Previous Post

जागावाटपाच्या वादातच अडकली  इंडिया आघाडी

Next Post

महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन मे महिन्यात; मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिली माहिती

Next Post
महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन मे महिन्यात; मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिली माहिती

महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन मे महिन्यात; मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिली माहिती

नेरूळ सेक्टर दोन येथील मल:निस्सारण केंद्राच्या जागी क्रिडा संकुलाच्या मंजूर झालेल्या कामास सुरुवात करा :  विद्या भांडेकर

झुक झुक आगीनकाडी, आता धावतेय देशप्रगतीसाठी

झुक झुक आगीनकाडी, आता धावतेय देशप्रगतीसाठी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com