• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 29, 2024

जागावाटपाच्या वादातच अडकली  इंडिया आघाडी

adminbyadmin
in संपादकीय
0
जागावाटपाच्या वादातच अडकली  इंडिया आघाडी

जयेश रामचंद्र खांडगे याजकडून

१७व्या लोकसभेचा कार्यकाळ लवकरच समाप्त होत असल्याने देशाच्या १८व्या लोकसभेसाठी लवकरच केंद्रिय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि त्याच क्षणी देशामध्ये आचारसंहिता लागू होईल.  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांना अजून दीड ते दोन महिन्याचा कालावधी बाकी असला तरी निवडणुकांचे पडघम साधाररणत: सात-आठ महिन्यापासूनच देशामध्ये वाजण्यास सुरुवात झालेली आहे. भाजपा देशामध्ये २०१४ पासून सत्तेवर आहे. २०१९ लाही देशाची सत्ता भाजपानेच संपादन केली होती आणि २०२४ ला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीतही भाजपाच सत्ता संपादन करण्याची दाट शक्यता आताच दिसत आहे. भाजपाचा अश्व सत्ता संपादनाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्या अश्वाला अडवण्याची क्षमता सध्या तरी कोणत्याही पक्षामध्ये अथवा आघाडीमध्ये पहावयास मिळत नाही. भाजपाला सत्तेपासून अडविण्यासाठी काँग्रेस पक्षाने अन्य विरोधी पक्षाची एकजूट करत भाजपविरोधात निवडणूक लढाई लढण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. तथापि निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यापूर्वीच या इंडिया आघाडीला फुटीचे ग्रहण लागलेले आहे. इंडिया आघाडीतील मातब्बर समजले जाणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीला रामराम ठोकत भाजपाशी मैत्री स्विकारली आहे. इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून गणल्या जाणाऱ्या काँग्रेसला २०१४ पासून लागलेली राजकीय घरघर अजूनही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. ज्या मातब्बरांनी काँग्रेस पक्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांच्या घरातील पुढील पिढी मात्र काँग्रेस पक्षाचा त्याग करत भाजपमध्ये जात आहेत. एकेकाळ माधवराव सिंधिया हे काँग्रेसमधील मातब्बर प्रस्थ म्हणून ओळखले जायचे. काही वर्षापूर्वी त्यांचे पुत्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम ठोकला व भाजपात प्रवेश केला. मुंबई काँग्रेस म्हणजेच मुरली देवरा हे अनेक वर्षांचे गणित होते. त्यांचे पुत्र मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा त्याग करत मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. शंकरराव चव्हाण हे काँग्रेसमधील अजून एक मातब्बर प्रस्थ आणि गांधी घराण्यांचे कडवट व विश्वासू शिलेदार. त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी राज्यसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसचा त्याग करत भाजपात प्रवेश केला. देशाच्या विविध राज्यांमध्ये काँग्रेसचे अनेक मातब्बर पक्षाचा त्याग करत भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. इंडिया आघाडीचा काँग्रेस हा मुख्य चेहरा असतानाही त्याच पक्षामध्ये ठिकठिकाणी गळती लागत आहे. त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचा भाजपाचा कसा सामना करणार, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यात ज्या काँग्रेसने इंडिया आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला, खटाटोप केला, त्याच काँग्रेसला आघाडीमध्ये कोणी फारसे जुमानत नसल्याचे अलिकडच्या घडामोडीदरम्यान स्पष्ट झाले आहे. आम आदमी पार्टी, तृणमुल काँग्रेस, समाजवादी पार्टी या तीन पक्षांनी तर आपला प्रभाव असणाऱ्या राज्यांमध्ये काँग्रेसला न जुमानता ‘एकला चलो रे’ची भूमिकाही जाहीर करत स्वत:च जागावाटप जाहिर केले होते. आपला पंजाब व दिल्लीमध्ये काँग्रेसशी युती करण्यात स्वारस्य नाही. तृणमुल काँग्रेसदेखील पश्चिम बंगालला सामावून घेण्यास रुची दाखवत नाही. समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात काँग्रेसचा प्रभाव नसल्याचे सांगत जागा देण्यास आडकाठी केली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली. अखेरिला आपने पंजाब व दिल्लीमध्ये तर समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात काँग्रेसला जागावाटपात स्थान देण्याची तयारी दाखविली आहे. जी काँग्रेस सत्तासंपादनासाठी आक्रमक होण्याची भाषा बोलत आहे, त्या पक्षाच्या सोनिया गांधी यांनी लोकसभा लढविण्यास प्रकृतीच्या कारणास्तव नकार देत राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून मागच्या दाराने संसदेत प्रवेश केला आहे. राहूल गांधीदेखील उत्तर प्रदेशएवजी दुसऱ्या राज्यातील सुरक्षित मतदारसंघाचा शोध घेत आहेत. मतदारसंघ न मिळाल्यास पुन्हा ते केरळच्या वायनाडू मतदारसंघाला पसंती देण्याची शक्यता आहे. अमेठी व रायबरेली या पारंपरिक मतदारसंघातून गांधी परिवार काढता पाय घेत असल्याचे चित्र तरी सुरवातीच्या टप्प्यात निर्माण झालेले आहे. रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी या गेल्या काही वर्षापासून पक्षांतर्गत राजकारणात सक्रिय असल्या तरी पक्षामध्ये आणि जनसामान्यांमध्ये प्रभाव निर्माण करण्यास त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा पडल्या आहेत. राहूल गांधींच्या भारत जोडोला तुरळक भागांचा अपवाद वगळता इतरत्र फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.  उत्तर प्रदेशसारख्या ८० जागा असलेल्या राज्यात ७० हून अधिक जागांवर विजय मिळविण्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. मोदी-योगी करिश्म्यामुळे ते शक्यही आहे.  भाजपाच्या सत्तेचा पायाच तेथेच रचला जाणार आहे. अयोध्या मंदिरामुळे भाजपाचा करिश्मा वाढीस लागला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या कानाकोपऱ्यात होत असलेली विकासकामांची मांदियाळी पाहता इंडिया आघाडीला भाजपाविरोधात प्रचार करण्यासाठी फारसे मुद्दे नसल्याची शोकांतिका आहे. केवळ मोदी विरोध करून देशाची सत्ता संपादन करणे त्यांना शक्य होणार नाही. त्यात इंडिया आघाडीमध्ये सुसंवाद नाही आणि अनेक भागात अविश्वासाचे वातावरण आहे.  आज आघाडीमध्ये सामील असणारा पक्ष उद्या भाजपाशी हातमिळवणी करणार नाही, याची कोणी खात्री देवू शकणार नाही. लोकसभा निवडणूकीतील जागावाटपावरून आघाडीतील घटक पक्षांमध्ये आताच वादाचे फटाके फुटू लागले आहेत. त्या तुलनेत भाजपा व मित्र पक्षांमध्ये जागावाटपावरून कोठेही वाद निर्माण होत असल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्राचा विचार करावयाचा झाल्यास ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी किमान ४५ जागांवर विजय मिळविण्याच्या ध्येयाने भाजपा गेल्या अनेक महिन्यांपासून संघटनात्मक पातळीवर कार्यरत आहे. भाजपाच्या जोडीला शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असल्याने विरोधकांची ताकद दुभंगली गेली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे मविआची ताकद कमी झालीआहे. त्याच प्रकाश आंबेडकरांनी २५ हून अधिक जागांची मागणी करत मविआला अडचणीत आणले आहे. जागावाटपावरून संघर्ष करणारी इंडिया आघाडी आणि विकासकामांच्या पाठबळावर जनसामान्यांपुढे मतदानासाठी जाऊ पाहणारी भाजपा पाहिल्यावर २०२४ची लढाई एकतर्फीच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

सिडकोने ही घरे परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव रचला आहे का ?

Next Post

निवडणूक सर्व्हेचे अंदाज हे भाजपासाठी दिलासादायी

Next Post
आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेब न्याय द्या अथवा आम्हा पिडीत दोन शेतकरी परिवाराला सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या : संदीप खांडगेपाटील

निवडणूक सर्व्हेचे अंदाज हे भाजपासाठी दिलासादायी

महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन मे महिन्यात; मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिली माहिती

महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन मे महिन्यात; मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिली माहिती

नेरूळ सेक्टर दोन येथील मल:निस्सारण केंद्राच्या जागी क्रिडा संकुलाच्या मंजूर झालेल्या कामास सुरुवात करा :  विद्या भांडेकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com