• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 17, 2024

नवी मुंबई पालिकेने अर्थसंकल्पात करवाढ करू नये :  आमदार गणेश नाईक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नवी मुंबई पालिकेने अर्थसंकल्पात करवाढ करू नये :  आमदार गणेश नाईक

सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई महापालिकेने २०२४- २५च्या अर्थसंकल्पात पुढील पाच वर्षे कोणताही मालमत्ता कर  आणि पाणीपट्टी वाढवू नये, अशी सूचना  लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सन २०२४-२०२५चा अर्थसंकल्प महापालिका लवकरच सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात शहर विकास, सोयी-सुविधा आणि भविष्यकालीन गरजा पाहता आमदार गणेश नाईक यांनी मौलिक सूचना केल्या आहेत.

नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. लोकप्रतिनिधी मंडळ अस्तित्वात नाही. या पार्श्वभूमीवर आमदार गणेश नाईक यांनी वेळोवेळी नवी मुंबईकरांच्या हिताचे अनेक निर्णय प्रशासनाकडून मंजूर करून घेतले आहेत. आमदार गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार  नवी मुंबईकरांवर  मागील २४  वर्षे कोणताही करवाढीचा  बोजा  लादण्यात आलेला नाही. मागील वर्षी प्रशासकीय काळात देखील करवाढ करण्यात आली नव्हती. यापुढेही हा करदिलासा सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्ताकडे केली आहे.

 नवी मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. या लोकसंख्येला पुरेल इतका पाणीसाठा भविष्यात लागणार आहे.  नवी मुंबईची भविष्यकालीन पाण्याची गरज भागवण्यासाठी  भिरा हायड्रो एक हजार एमएलडी  पाणी योजना आमदार गणेश नाईक यांनी सुचवली असून या योजनेसाठी देखील बजेटमध्ये भरीव तरतूद करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

शहरातील अंतर्गत दळणवळण उत्तम राहून सुरळीत वाहतुकीसाठी आमदार नाईक यांनी सिटी मोबिलिटी प्लॅनची संकल्पना मांडली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरु असून या अंतर्गत शहरात आवश्यक ठिकाणी त्यांनी उड्डाणपूल बांधण्याची सूचना केली आहे. ऐरोली-कटाई उन्नत मार्गावर ठाणे-बेलापूरच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिकांचे निर्माण करण्यासाठी निधी राखीव ठेवण्याची सूचना केली आहे. त्याचबरोबर नाला व्हिजन अंतर्गत कामांना  गती देण्यासाठी निधीची तरतूद करण्याची सूचना केली आहे. सर्वच नोडमध्ये सार्वजनिक रुग्णालये, नागरी  आरोग्य केंद्र, माता बाल रुग्णालयांच्या निर्मितीसाठी निधी ठेवावा.  महापालिका शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भरीव निधी ठेवावा. अत्याधुनिक पद्धतीने घनकचऱ्याची व्यवस्था करण्यासाठी निधीची तरतूद  करावी. शहराला जोडणारा कोस्टल रोडसाठी निधी राखीव ठेवावा. कांडोनियम अंतर्गत कामे करण्यासाठी निधीची तरतूद करावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही योजना दोन प्रभावीपणे राबिण्यासाठी निधी राखीव ठेवावा, अशा  मौलिक सूचना करून आमदार गणेश नाईक यांनी पालिकेचा आतापर्यंतचा  कारभार आर्थिक शिस्तीचा राहिल्याने पालिकेला डबल ए प्लसचे आर्थिक मानांकन प्राप्त झाले आहे. पुढील काळात  मोठे प्रकल्प करताना डेफर पेमेंट  आणि बॉण्डस या आर्थिक सोयीचा वापर करण्याचा सल्ला आमदार नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिला असून यामुळे अर्थसंकल्पावर भार पडणार नाही.

उड्डाणपूल, अंडरपास, भुयारी मार्ग, उड्डाणपूल जोड मार्गिका,  एस्केलेटर, सार्वजनिक रुग्णालय,  नागरी आरोग्य केंद्र, माता-बाल रुग्णालय, नागरिकांचा विमा,  इंग्रजी माध्यमाच्या शाळा,  अबॅकस  शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी सकस आहार, गणवेश, पुस्तके, टॅब, वैद्यकीय सोयी सुविधा,  खेळाच्या मैदानांचा विकास,  युवक प्रशिक्षण केंद्र, पाणीगळती थांबविण्याकरिता उपाययोजना, बटरफ्लाय गार्डन, फ्लेमिंगो सफारी,  गवळीदेव, सुलाई देवी पर्यटनस्थळ विकास, डिस्कव्हरी गार्डन,  प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना,कौशल्य विकास केंद्र, एसटीपी पाणी पुनर्वापर, होल्डिंग पौंड सफाई, तलावांचे सुशोभीकरण, पार्किंग व्यवस्था, प्रवेशद्वाराची उभारणी, मत्स्यालयाची निर्मिती, ट्रांजिट  कॅम्पची निर्मिती,  जेष्ठ नागरिकांना नाममात्र दरात वैद्यकीय सेवा, वर्दळीच्या  ठिकाणी स्कायवॉक, निराधार जेष्ठांसाठी वृद्धाश्रम,  आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, करियर मार्गदर्शन अभ्यासिका,  इनडोअर स्टेडियमची निर्मिती, आगरी-कोळी भवन, वारकरी भवनची निर्मिती,  विविध संत आणि महान व्यक्तींच्या नावे भवन निर्मिती,  आदिवासी घरकुल योजना,  नोकरदार महिलांसाठी पाळणाघर,  झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांसाठी रात्र शाळा, पॅरामेडिकल आणि नर्सिंग कॉलेज,  आंतरराष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे माहिती केंद्र, बचत गट उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी केंद्रांची उभारणी, नाका कामगारांसाठी निवारा,  बेघरांसाठी रात्र निवारा केंद्र,  इलेक्ट्रिक बसेस, हायड्रोजन फ्युएल बसेस खरेदी, महिला सक्षमीकरण योजना, लोककल्याणकारी योजना,  महिला उद्योग केंद्र, आरोग्य सेवा, नवीन रुग्णालये,  कॅथलॅब,  पालिकेचे पेपरलेस कामकाज, गृहनिर्माण सोसायट्यांसाठी  कचरापेटी पुरवठा योजना,  पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी वाशी डेपोच्या धर्तीवर अन्य डेपोचा विकास या बाबींसाठी निधीच्या तरतुदीची मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.

Previous Post

बेलापूर किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेतून इतिहासाला अभिवादन

Next Post

नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? : मल्लिकार्जून खरगे.

Next Post
नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? : मल्लिकार्जून खरगे.

नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, २०१४ साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? : मल्लिकार्जून खरगे.

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

मुंबई – गोवा महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग असे नाव देण्याची एमआयएमची मागणी

कॉंग्रेस कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

कॉंग्रेस कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com